Join us  

Relationship Tips : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींचं दिग्दर्शकांवर जडलं प्रेम; पाहा जोडप्यांचे एकापेक्षा एक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 6:22 PM

Relationship Tips : काही बॉलीवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनेत्यांची निवड न करता दिग्दर्शकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून पसंत केले.  

असं म्हणतात की प्रेमाला सीमा नसतात आणि बॉलिवूड जगतात एकमेकांची हृदय जुळायला वेळ लागत नाही. इथे जितक्या लवकर लोक एकत्र येतील तितक्या लवकर ते दूरही जातात. स्टार्सचे कोस्टारर्सशी असलेले रिलेशन्स तुम्हाला माहितच असतील. पण काही बॉलीवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनेत्यांची निवड न करता दिग्दर्शकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून पसंत केले.  

महेश भट्ट आणि सोनी राजदान 

दिग्दर्शक महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची भेट 'सारांश' चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. महेश विवाहित होता पण सोनी राजदानच्या प्रेमात पडला. जेव्हा सोनी राजदानच्या कुटुंबाने या नात्यावर प्रश्न विचारला, तेव्हा महेश भट्ट यांनी तिला शब्द दिला. असे म्हटले जाते की दोघांनीही धर्म बदलून गुपचूप लग्न केले, कारण महेश त्यांची मुले राहुल आणि पूजा भट्ट यांच्यामुळे पहिली पत्नी किरणला घटस्फोट देण्यास असमर्थ होते. नंतर, महेश भट्टच्या सोनी राजदानसोबतच्या लग्नाची अधिकृत बातमी एका फिल्मी मासिकामध्ये प्रसिद्ध झाली जी त्या काळातील सर्वात खळबळजनक बातम्यांपैकी एक होती. आज या दोघांना आलिया आणि शाहीन भट्ट ही स्टार किड्स आहेत. 

श्रीदेवी आणि बोनी कपूर

बोनी कपूर यांनी श्री देवीला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी बोनी कपूर यांचे आधीच लग्न झालं होतं. तरीसुद्धा त्यांनी श्रीदेवीच्या सोबत राहण्याचं ठरवलं. शेवटी  १९९६ मध्ये त्यांनी लग्न केलं.

उदिता गोस्वामी आणि मोहित सूरी

उदिता गोस्वामी काहीतरी मोठे करायचे स्वप्न घेऊन मोठ्या शहरात आली होती आणि मग तिला तिचा पहिला चित्रपट 'झेहर' मिळाला. दिग्दर्शक म्हणून मोहित सुरीचा हा पहिला चित्रपट होता. या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. उदिता आणि मोहितने 2005 मध्ये डेटिंगला सुरुवात केली आणि 2013 मध्ये लग्न केले.

रानी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा

राणी मुखर्जीचा पहिला चित्रपट 'राजा की आएगी बारात' पाहून आदित्य आश्चर्यचकित झाला. जेव्हा करण जोहर त्याच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटासाठी टीनाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री शोधत होता, तेव्हा आदित्यनेच करणला राणी मुखर्जीचा अभिनय पाहण्यास सांगितले. करण राणीच्या अभिनयाने खूप प्रभावित झाला आणि तिला चित्रपटात कास्ट केले, पण तोपर्यंत दोघांमध्ये कोणताही संबंध नव्हता.

आदित्य चोप्राने 2001 मध्ये पायल खन्नाशी लग्न केले.  हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले. काही काळानंतर आदित्य आणि राणी एकमेंकाना भेटले. राणीने यशराज चोप्रासोबत अनेक चित्रपट केले.  यश राज चोप्राच्या प्रत्येक कार्यक्रमात राणी दिसत होती. बऱ्याच काळानंतर २०१४ साली आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांनी इटलीमध्ये लग्न केले. 

यामी गौतम आदित्य धर

यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले आहे. आदित्यने काबूल एक्सप्रेस, हाल ए दिल यांसारख्या चित्रपटांची गाणी लिहिली आहेत तर उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटादरम्यान दोघांची भेट झाली, पण मैत्री चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान झाली. हळू हळू बोलत दोघे जवळ आले. चित्रपटाचे सेट आणि क्रू यांनाही दोघांबद्दल माहिती नव्हती, कारण दोघांनाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कोणालाही काही कळू दिले नाही.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपबॉलिवूड