Join us   

करिअरसाठी घरातून पळून गेलेल्या, घराच्यांची नाराजी ओढवून घेतलेल्या ७ अभिनेत्री- बघा आज काय करतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2024 4:08 PM

1 / 8
बॉलीवूडची डोळे दिपवून टाकणारी दुनिया अनेकांना पार वेड लावते. याच वेडापायी कित्येकजण घरदार सोडून मुंबईत येऊन दाखल झाले. काहींनी स्वत:ला सिद्ध करत या मोहमायेत स्वत:ची जागा निर्माण केली, तर काही आले तसे निघूनही गेले. यामध्ये अभिनेत्रींचे प्रमाणही बरेच आहे.
2 / 8
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा रानौतही तशीच. अतिशय सामान्य कुटूंबातल्या कंगणाने मोठ्या हिंमतीने तिचे घर सोडले आणि खूपच कमी वेळात स्वत:ला सिद्ध केले.
3 / 8
मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेची गोष्टही तशीच. तिच्या घरच्यांना तिचं अभिनय करणं मान्य नव्हतं.
4 / 8
छोट्या पडद्यावरची मोठी अभिनेत्री हिना खान हिच्या पालकांचीही तिने या क्षेत्रात यावे, अशी इच्छा नव्हती.
5 / 8
घरच्यांची नाराजी ओढवून अभिनय क्षेत्रात आलेली आणखी एक अभिनेत्री म्हणजे शेहनाज गिल.
6 / 8
सारा अली खानला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी घरदार सोडण्याची गरज पडली नाही. पण तिचे वडील म्हणजेच अभिनेता सैफ अली खान याला साराने या क्षेत्रात येणं आवडलेलं नव्हतं.
7 / 8
करिश्मा कपूर हिनेही जेव्हा वयाच्या १५ व्या वर्षी करिअरला सुरुवात केली, तेव्हा तिच्या वडिलांना म्हणजेच रणधीर कपूर यांनाही ते पटलेलं नव्हतं. ते तिच्यावर खूप नाराज होते. पण तिलाही इतर अभिनेत्रींप्रमाणे घर सोडून यावं लागलं नव्हतं.
8 / 8
अभिनेत्री मल्लिका शेरावत ही देखील अतिशय सामान्य कुटूंबातली आहे. तिच्या कुटूंबात तर महिलांनी चित्रपट पाहायला जाण्याचीही परवानगी नव्हती. अशा वातावरणातून ती पळून आली आणि थेट मुंबई गाठून स्वत:चं नशिब आजमावून पाहिलं- स्वत:ची ओळख निर्माण केली.
टॅग्स : सोशल व्हायरलबॉलिवूडकंगना राणौतकरिश्मा कपूरसारा अली खानशेहनाझ गिल