1 / 7विद्यार्थांनी वर्षभर जी मेहनत घेतलेली असते, त्याचा समारोप म्हणजे वार्षिक परीक्षा. दहावी- बारावीच्या वार्षिक परीक्षा सुरू होऊन आता संपतही आल्या आहेत.2 / 7लवकरच इतर वर्गांच्या परीक्षाही सुरू होतील. अभ्यास तर सगळा झाला होता. पण मला उत्तर आठवतच नव्हतं, अशी तक्रार अनेक विद्यार्थी करतात. म्हणूनच परीक्षेच्या काळात आणि खरंतर कमी वयापासूनच मुलांना काही पदार्थ नियमितपणे खायला दिले पाहिजेत.3 / 7ते पदार्थ नेमके कोणते आणि ते खाल्ल्याने काय होतं, याविषयीची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी chitchatrajlaviandrajeshwarisachdev या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. डॉक्टर सांगतात की हे पदार्थ खाल्ल्यामुळे ब्रेन सेल्स रिपेअर व्हायला मदत होते. मेंदूला ऑक्सिजन आणि ग्लुकोज यांचा चांगला पुरवठा होतो आणि मेंदूचे आरोग्य उत्तम राहते.4 / 7मेंदूचे आरोग्य चांगले असल्यास स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा...5 / 7यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे ब्राह्मी. दिवसातून दोन वेळा १- १ टीस्पून ब्राह्मी पावडर मुलांना द्या. 6 / 7शंखपुष्पीही मुलांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे.7 / 7स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारा आणखी एक पदार्थ म्हणजे पेठा ज्या फळापासून तयार करतात ते पेठ्याचं फळ. यालाच Ash Gourd किंवा kushmanda असंही म्हणतात. त्याचा ज्सूस रोज सकाळी नियमित पिणे मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.