तुमचं डोकं दुखतंय की टाच-पाहा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेने कोणता आजार होतो

Updated:February 2, 2026 15:45 IST2026-02-02T15:36:50+5:302026-02-02T15:45:04+5:30

See which vitamin deficiency causes which disease, it is important to know this basic information : अगदी सामान्य मात्र महत्वाची माहिती. जीवनसत्त्वांची कमतरता पडेल महागात.

तुमचं डोकं दुखतंय की टाच-पाहा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेने कोणता आजार होतो

शरीराला सगळ्याच पोषक घटकांची गरज असते. आहारातून मिळणारी जीवनसत्वे, खनिजे, लोह,आदी सगळ्याचे प्रमाण संतुलित असेल तरच व्यक्ती पूर्णपणे फीट असते. जर एखाद्या सत्वाची कमतरता असेल तर शरीराची कोणती ना कोणती प्रक्रिया मंदावते.

तुमचं डोकं दुखतंय की टाच-पाहा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेने कोणता आजार होतो

जीवनसत्वे विविध प्रकारची असतात. त्यांची कार्येही वेगळीच. जसे की जीवनसत्त्व ए दृष्टी, वाढ, रोगप्रतिकार शक्ती, आदी गोष्टी व्यवस्थित ठेवण्याचे कार्य करते.

तुमचं डोकं दुखतंय की टाच-पाहा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेने कोणता आजार होतो

जीवनसत्त्व बी एकच नसून त्याचा समूह असतो. पचनसाठी खास म्हणजे मेटाबॉलिझम चांगले ठेवण्यासाठी हे गरजेचे असते. शरीराला ऊर्जा देणे आणि ती टिकवणे यासाठी या जीवनसत्त्वाची पातळी चांगली असावी लागते.

तुमचं डोकं दुखतंय की टाच-पाहा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेने कोणता आजार होतो

जीवनसत्त्व सी ची कमतरता अनेकांमध्ये असते. त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी कोलेजन तयार करण्यासाठी या जीवनसत्त्वाची गरज सगळ्यात जास्त असते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही ते महत्त्वाचे आहे.

तुमचं डोकं दुखतंय की टाच-पाहा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेने कोणता आजार होतो

हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम आणि पोटॅशियम चांगले असणे गरजेचेच. हाडांचे आणि दातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गरजेच्या असणाऱ्या गरजेच्या पोषणांचा पुरवठा जीवनसत्त्व डी करते. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी याची सगळ्यात जास्त गरज असते.

तुमचं डोकं दुखतंय की टाच-पाहा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेने कोणता आजार होतो

जीवनसत्त्व ई डोळ्यांसाठी, त्वचेसाठी, यकृतासाठी तसेच हृदयासाठी गरजेचे असते. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात हे जीवनसत्त्व देणारे पदार्थ हवेच.

तुमचं डोकं दुखतंय की टाच-पाहा कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेने कोणता आजार होतो

जीवनसत्त्व के शरीराचे अत्यंत महत्त्वाचे काम करते ते म्हणजे रक्ताची पातळी आणि शुद्धता सांभाळणे. रक्ताच्या गाठी होऊ नयेत म्हणून हे जीवनसत्त्व अगदी गरजेचं.