1 / 7मुलीला मासिक पाळी सुरु झाली की मुलगी वयात आली असे म्हटले जाते. पाळी येणे हे प्रजननासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. पाळी जशी सुरु होते तशीच एका ठराविक वयानंतर बंदही होते. सगळ्यांची सारख्याच वयात बंद होत नाही. वेळ काळ वेगळा असतो. 2 / 7महिलांमध्ये मासिक पाळी बंद होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला मेनोपॉज असे म्हणतात. महिलेच्या आयुष्यातील प्रजननक्षमता संपुष्टात आल्याचे ते लक्षण आहे. मेनोपॉज नंतर पाळी बंद होते आणि मुल-बाळ होत नाही. साधारणपण वयाच्या ४५ ते ५२ वर्षापर्यंत मेनोपॉज कधीही होऊ शकतो. काही महिलांना चाळीशी किंवा त्या आधीही मेनोपॉज सुरु होतो. 3 / 7मेनोपॉज सुरु होण्याची काही लक्षणे असतात. पाळी येणे कमी होते. रक्तस्त्राव कमी जास्त होतो. नेहमीपेक्षा प्रक्रिया वेगळी असल्याचे जाणवते. पाळीच्या चक्रात विविध बदल जाणवतात. 4 / 7घाम येण्याचे प्रमाण वाढते. सारखा घाम येतो आणि शरीर गरम असल्याचे जाणवते. छातीत तसेच मानेजवळ गरम जाणवायला लागते. चेहराही गरम झाल्यासारखे भासते. सतत शरीर घामट जाणवते. 5 / 7पाळीच्या दिवसात होतात त्यापेक्षा जास्त मुडस्विंग्स होतात. चिडचिड होते तसेच सतत रडावेसे वाटते. उदास असल्यासारखे वाटते. अनेक भावना एकत्र जाणवतात. योनीजवळ खाज येते. तसेच कोरडेपणा जाणवतो. दुखायलाही लागते. त्यामुळे फार चिडचिड होते आणि काय करावे सुचत नाही. 6 / 7झोप लागत नाही. रात्री भरपूर घाम सुटतो. सतत जाग येते. शांत झोपता येत नाही आणि त्यामुळे दिवसभर झोपाळ्यासारखे वाटत राहते. रात्री डोक्यात विचारांचे चक्र सुरु राहते. कोणत्याही गोष्टींचा विचार करुन ताण येतो. 7 / 7