1 / 7कित्येक जण असे आहेत ज्यांना रात्री शांत झोप येत नाही. कितीतरी वेळ अंथरुणावर तळमळत पडून राहावं लागतं तरी डोळा लागत नाही. 2 / 7रात्री उशिरा कधीतरी डोळा लागतो. पण लगेच जाग येते. त्यामुळे नेहमीच झोप अपुरी होते.(ayurvedic tips for sound sleep)3 / 7नेहमीच अशी अर्धवट झोप होत असेल तर त्याचा परिणाम शरीरावर, मनावर होतोच. अनेक आजार मागे लागतात. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. वारंवार अपुऱ्या झोपेमुळे मेंदूवरही ताण येतो, स्ट्रेस वाढतो. विस्मरणाचा त्रासही मागे लागण्याचा धोका असतोच.4 / 7त्यामुळेच झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. आता ज्या लोकांना रात्री लवकर झोप येत नाही ते डोक्याला मालिश करतात. पण त्याने म्हणावा तसा फायदा होत नाही.5 / 7कारण आयुर्वेदानुसार असे सांगण्यात आले आहे की आपल्या झोपेशी संबंधित जे पॉईंट किंवा बिंदू असतात ते तळपायामध्ये असतात. 6 / 7त्यामुळे रात्री झोपण्यापुर्वी तळपायाला चोळून मसाज करा. हलक्या हाताने तळपाय दाबा. यामुळे ते पॉईंट व्यवस्थित दाबले जातील आणि पायातला रक्तपुरवठा वाढेल. याचा चांगला परिणाम तुमच्या झोपेवर दिसून येईल.7 / 7अंथरुणावर पडताच चटकन आणि शांत झोप लागेल. काही दिवस हा उपाय करून पाहा.