आजीआजोबांनी खाऊ नयेत ‘ही’ फळं, तब्येत बिघडून गाठावा लागतो डॉक्टर! पाहा कोणती फळं खाणं योग्य...

Updated:June 27, 2025 21:11 IST2025-06-27T15:54:53+5:302025-06-27T21:11:12+5:30

5 Worst Fruits For Adults Ayurvedic Doctor Says Can Spoil Your Health : Worst Fruits For Adults : वय वाढल्यावर पचनशक्ती व आरोग्य हळूहळू कमजोर होते, अशावेळी कोणती फळं खाऊ नयेत...

आजीआजोबांनी खाऊ नयेत ‘ही’ फळं, तब्येत बिघडून गाठावा लागतो डॉक्टर! पाहा कोणती फळं खाणं योग्य...

वय वाढलं की पचनशक्ती आणि आरोग्य दोन्ही हळूहळू कमजोर होऊ लागतं, त्यामुळे आहारात योग्य बदल करणं आवश्यक ठरतं. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते काही फळं अशा वयात टाळणं केव्हाही चांगलं, कारण ती पचनावर ताण आणू शकतात, साखरेचं प्रमाण वाढवू शकतात किंवा ॲसिडिटीची समस्या निर्माण करू शकतात(5 Worst Fruits For Adults Ayurvedic Doctor Says Can Spoil Your Health).

आजीआजोबांनी खाऊ नयेत ‘ही’ फळं, तब्येत बिघडून गाठावा लागतो डॉक्टर! पाहा कोणती फळं खाणं योग्य...

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर सलीम जैदी यांनी त्यांच्या युट्युब व्हिडीओच्या (Worst Fruits For Adults) माध्यमातून, उतार वयात कोणती फळं खावीत आणि कोणती नाही याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

आजीआजोबांनी खाऊ नयेत ‘ही’ फळं, तब्येत बिघडून गाठावा लागतो डॉक्टर! पाहा कोणती फळं खाणं योग्य...

डॉ. सलीम जैदी यांच्यामते आंबा वृद्धांसाठी चांगला नाही. आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं, ज्यामुळे वाढत्या वयात मधुमेह, वजन वाढणं आणि पोटाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला आहे की वयाच्या साठीनंतर आंबा खाऊ नका किंवा कमी प्रमाणात खावा. डॉ. जैदी सांगतात की, जर तुम्हाला आंबे खूपच आवडत असतील, तर तुम्ही दिवसांतून १ ते २ आंब्याचे तुकडे खा. परंतु आंबा कधीही रिकाम्या पोटी खाऊ नका, रात्री आंबा खाणं टाळा आणि नेहमी आंबा प्रथिनेयुक्त पदार्थांसोबतच खा.

आजीआजोबांनी खाऊ नयेत ‘ही’ फळं, तब्येत बिघडून गाठावा लागतो डॉक्टर! पाहा कोणती फळं खाणं योग्य...

चिकूमध्ये भरपूर साखर असते, ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. मधुमेही ज्येष्ठांनी हे फळ टाळावे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याशिवाय, ६० वर्षांनंतर निरोगी व्यक्तीसाठीही हे फळ हानिकारक ठरू शकते.

आजीआजोबांनी खाऊ नयेत ‘ही’ फळं, तब्येत बिघडून गाठावा लागतो डॉक्टर! पाहा कोणती फळं खाणं योग्य...

आरोग्य तज्ज्ञांच्या मते लीची फळ वृद्धांसाठी खाणं हानिकारक ठरू शकतं. लीचीमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. जास्त प्रमाणात लीची खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते आणि पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला लीची खूप आवडत असेल, तर एका वेळी फक्त ४ ते ५ लीचीच खा. पण, जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर लीचीपासून दूर राहणं उत्तम.

आजीआजोबांनी खाऊ नयेत ‘ही’ फळं, तब्येत बिघडून गाठावा लागतो डॉक्टर! पाहा कोणती फळं खाणं योग्य...

लालचुटुक, गोड कलिंगड सगळ्यांनाच खायला आवडतं पण डॉक्टर, वृद्ध व्यक्तींना ते खाण्याचा सल्ला देत नाहीत. कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. याशिवाय, कलिंगडामुळे पोटफुगी, अपचन आणि पचनासंबंधी अन्य समस्या होऊ शकतात. त्यामुळे वृद्धांनी कलिंगड खाणं टाळावं.

आजीआजोबांनी खाऊ नयेत ‘ही’ फळं, तब्येत बिघडून गाठावा लागतो डॉक्टर! पाहा कोणती फळं खाणं योग्य...

या सर्व फळांसोबतच, डॉक्टर फणस न खाण्याचा सल्ला देतात. डॉ. सलीम जैदी यांच्या मते, फणस सहज पचत नाही. अशा परिस्थितीत, फणस खाल्ल्याने वृद्धांमध्ये गॅस, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.

आजीआजोबांनी खाऊ नयेत ‘ही’ फळं, तब्येत बिघडून गाठावा लागतो डॉक्टर! पाहा कोणती फळं खाणं योग्य...

वय वाढल्यानंतर, डॉक्टर जांभूळ, पेरु, पपई, डाळिंब, आवळा अशी फळं खाण्याचा सल्ला देतात.

आजीआजोबांनी खाऊ नयेत ‘ही’ फळं, तब्येत बिघडून गाठावा लागतो डॉक्टर! पाहा कोणती फळं खाणं योग्य...

जांभूळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जांभूळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त मानले जाते. आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याव्यतिरिक्त त्याचे अनेक फायदे आरोग्याला मिळतात.

आजीआजोबांनी खाऊ नयेत ‘ही’ फळं, तब्येत बिघडून गाठावा लागतो डॉक्टर! पाहा कोणती फळं खाणं योग्य...

याचबरोबर, डाळिंब हे हृदय आणि मेंदू दोन्हीसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. पपई हे बद्धकोष्ठता आणि पोटासाठी सर्वोत्तम फळ आहे.

आजीआजोबांनी खाऊ नयेत ‘ही’ फळं, तब्येत बिघडून गाठावा लागतो डॉक्टर! पाहा कोणती फळं खाणं योग्य...

पेरु फायबरयुक्त आहे आणि याचा ग्लायसेमिक इंडेक्सदेखील खूप कमी आहे, जो आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. अशा प्रकारे, तुम्ही स्वतःसाठी योग्य फळांची निवड करून तुमच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकता आणि वयाची साठी ओलांडल्यावर येणाऱ्या समस्यांपासून बचाव करून स्वतःची काळजी घेऊ शकता.