चुकूनही ‘या’ ७ भाज्या शिजतांना पाणी घालू नका, करा वाफेवर! नाहीतर भाजी होईल बेचव...
Updated:June 18, 2025 19:09 IST2025-06-18T15:42:19+5:302025-06-18T19:09:56+5:30
Never Make The Mistake Of Adding Water While Cooking These 7 Sabji : No Need To Add Water While Cooking Theses 7 Sabji : भाजी करताना कोणत्या भाज्यांमध्ये पाणी घालणं टाळावं आणि का, हे जाणून घेणं गरजेचं आहे...

आपल्यापैकी बऱ्याचजणी स्वयंपाक करताना अनेक साध्यासोप्या (Never Make The Mistake Of Adding Water While Cooking These 7 Sabji) टिप्सचा वापर करतात. या टिप्समुळे स्वयंपाक झटपट आणि पदार्थ चविष्ट व रुचकर लागतात. अशाच खास टिप्सपैकी एक म्हणजे, भाजी लवकर शिजवण्यासाठी आणि तळाला लागू नये म्हणून आपण त्यात पाणी घालतो.
काहीवेळा आपण अशा भाज्यांमध्येही पाणी घालतो जिथे खरंतर अजिबात गरज (No Need To Add Water While Cooking Theses 7 Sabji) नसते. यामुळे भाजीचा नैसर्गिक स्वाद पूर्णपणे बिघडतो. यासाठीच, भाजी करताना कोणत्या भाज्यांमध्ये पाणी घालणं टाळावं आणि का, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
१. कारलं :-
कारलं शिजवताना जर पाणी घातलं तर भाजी जास्त चिकट आणि मऊसर होते. इतकेच नाही तर यामुळे कारल्याची कडवट चव अधिकच वाढते. त्यामुळे कारलं शिजवताना पाणी न घालता मंद आचेवर तेल व मसाल्यांसोबत परतल्यास ती कुरकुरीत, स्वादिष्ट आणि पचनाला हलकी होतात.
२. शिमला मिरची :-
शिमला मिरची शिजवताना जर पाणी घातलं तर तिच्या कुरकुरीतपणावर, सुगंधावर आणि रंगावर परिणाम होतो. त्यामुळे ती मऊसर होते. यासाठीच, शिमला मिरची नेहमी पाणी न घालता हाय फ्लेमवर ड्राय रोस्ट करावी, त्यामुळे तिचा नैसर्गिक स्वाद आणि कुरकुरीतपणा टिकून राहतो.
३. पालक :-
पालक गरम करताना ती अगदी पटकन शिजते. जास्त पाणी घातल्यास पालकचा स्वाद फिका पडतो आणि भाजी पाणचट, पचपचीत व कमी चविष्ट, लागते. यासाठीच, पालक नेहमी कमी पाण्यात शिजवावा किंवा तिचे पोषक तत्त्व आणि नैसर्गिक चव टिकवण्यासाठी वाफेवर शिजवणं अधिक फायदेशीर ठरते.
४. कोबी :-
कोबीमध्ये नैसर्गिक ओलावा असतो आणि त्याचा कुरकुरीतपणा हीच त्याची खासियत असते, ज्यामुळे कोबी चविष्ट लागतो. त्यामुळे कोबीची भाजी हलक्या तेलात, पाणी न घालता परतून शिजवावी. असं केल्याने कोबीची नैसर्गिक चव आणि फ्लेवर टिकून राहतो. पाणी घातल्यास कोबी जास्त मऊ होतो आणि त्याच्या चवीतही फरक पडतो.
५. भेंडी :-
भेंडी शिजवताना भेंडीतून चिकट द्रव पदार्थ बाहेर पडतो. जर भेंडीच्या भाजीत पाणी घातलं तर ती आणखी जास्त चिकट व पचपचीत होते. यासाठी भेंडी कमी तेलात शिजवावी. शक्य असेल तर भाजी बनवण्याआधी भेंडी चांगली सुकवावी, त्यामुळे तिचा चिकटपणा कमी होईल आणि भाजी चविष्ट बनेल.
६. तोंडली :-
तोंडली त्याच्या नैसर्गिक कुरकुरीतपणामुळे आणि स्वादामुळे चविष्ट लागते. पण जर या भाजीत पाणी घातलं तर सगळा कुरकुरीतपणा निघून जातो आणि भाजी मऊसर व पाणचट होते. यासाठी तोंडली नेहमी तेल व मसाल्यांमध्ये परतून शिजवावी. तोंडलीमध्ये असणाऱ्या नैसर्गिक ओलाव्यातच ही भाजी सहज शिजते.
७. भोपळा :-
भोपळा शिजवताना अनेकदा चुकून त्यात पाणी घालण्यात येतं, पण ही भाजी शिजवताना पाणी घालणं टाळावं. कारण भोपळ्यामध्ये नैसर्गिक ओलावा भरपूर प्रमाणात असतो. जर त्यात वेगळं पाणी घातलं, तर भाजी अत्यंत मऊसर आणि चवहीन होते. पाणी घातल्यामुळे भोपळ्याच्या गोडसर आणि सौम्य चवीत फरक पडतो.