काही मोजक्या मुलांचा अपवाद सोडला तर असे बरेच मुलं आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की त्यांना चॉकलेट, पेस्ट्री, कॅडबरी, आईस्क्रीम, कुल्फी असे गोड पदार्थ खायला खूप आवडते. अशी मुलं सतत गोड पदार्थ मागत असतात. आई-वडिलांनी कितीही सांगितलं, नाही म्हटलं तरी ऐकत नाहीत. मुलांची गोड खाण्याची सवय कशी कमी करावी, याविषयीचा एक खास उपाय अभिनेत्री राणी मुखर्जी सांगते आहे (Parenting Tips By Actress Rani Mukharji). राणी मुखर्जी म्हणते की तिची मुलगी अदिरा सतत रसगुल्ले खायला मागायची. मुलीची ही सवय तिने मुलीला न रागावता एकदम स्मार्ट पद्धतीने सोडवली.(Rani Mukharji shared her smart tricks to feed healthy food to kids)
मुलं सतत गोड खायला मागत असतील तर काय करावे?
चॉकलेट, पेस्ट्री, केक, कॅडबरी अशा गोड पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. अतिप्रमाणात साखर खाणे मुलांसाठीही हानिकारक आहे. आठवड्यातून कधीतरी एकदा गोड खाल्ले तर हरकत नाही.
भर पावसाळ्यातही मोगऱ्याचे रोप कोमेजले? ३ टिप्स- ८ दिवसांत रोप होईल टवटवीत, हिरवेगार
पण मुलांना रोज चॉकलेट किंवा इतर गोड पदार्थ देणं त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाहीच. अशीच चिंता राणी मुखर्जीला तिच्या मुलीबाबत वाटत होती. म्हणूनच तिने एक खास उपाय केला. सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर यांनी काही दिवसांपूर्वी राणी मुखर्जीची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये गप्पांच्या ओघात सांगताना राणी म्हणाली की खाऊ नको किंवा अमुक गोष्ट करू नको असं म्हटलं तर मुलं हटकून तीच गोष्ट वारंवार करतात.
म्हणूनच राणीने एक उपाय शोधला. मुलीने रसगुल्ले खायला मागितले की ती तिला भरपूर द्यायची. अजून घे, अजून घे हा आग्रह करायची. इतके दिवस रसगुल्ल्यांना नाही म्हणणारी आहे, आता अचानक असं का म्हणते आहे असं वाटून मुलीने आपोआपच रसगुल्ले खाणं कमी करून टाकलं.
राणीने हा जो उपाय केला त्यालाच 'रिव्हर्स सायकॉलॉजी' असं म्हणतात. तुम्हाला जी गोष्ट समोरच्या व्यक्तीकडून करून घ्यायची आहे, त्याच्या बरोबर उलटी गोष्ट त्याला वारंवार करण्यास सांगायचं. एकवेळ अशी येते की आपोआपच समोरची व्यक्ती त्याच्या मनाचं न करता तुमचं ऐकू लागते. मुलांच्या बाबतीत 'रिव्हर्स सायकॉलॉजी' कधीकधी खूप विचित्र आणि चुकीच्या पद्धतीनेही काम करू शकते. त्यामुळे राणीने सांगितलेला हा उपाय करून पाहा; पण त्याचा दबाव मुलांच्या मनावर निर्माण होईल असं मात्र करू नका.