Join us

मुले सतत चिडचिड -रागराग का करतात? आईवडिलांच्या ५ चुका मुलांसाठी जीवघेण्या, मुलं इतकी चिडकी की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2025 14:48 IST

Why kids get angry at parents: 5 reasons for child anger at home: मुले सतत चि़डचिड-रागराग का करतात? याचे नेमके कारण काय पाहूया.

मोठ्या घरातील इतरांचा राग मुलांवर काढायचा आणि तो राग त्यांनी निमूटपणे सहन करायचा असं पूर्वीपासूनच होत आले आहे. परंतु हे चित्र सध्या पालटताना दिसायला लागलं.(How to deal with angry child) प्रत्येक पालकाचा असे वाटते की, त्यांच्या मुलाने त्यांचे ऐकावे आणि आदर करावे.(Child gets angry easily at home) पण कधीकधी मुले त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्यावर रागराग करतात.(Angry child parenting mistakes)अनेक घरात हे असेच सुरु राहते. ज्यामुळे मुले आणि आई-बाबा यांच्यामध्ये नवा संघर्ष सुरु होतो.(Why kids get angry at parents) मुलांचा राग आणि संताप हा विविध पद्धतीने बाहेर पडू लागतो.(Reasons children get angry at home) अनेकदा आई-वडील मुलांच्या मनाची काळजी व्यवस्थित घेतात परंतु, काही घरांमध्ये ही परिस्थिती वेगळी असते. मुले सतत चि़डचिड-रागराग का करतात? याचे नेमके कारण काय पाहूया. (Child anger issues with parents)

मुलांची उंची वाढत नाही? वेळीच करा ५ योगासने - मुले होतील ताडमाड उंच आणि दणकट

1. मुलांना कमजोर समजू नका 

अनेकदा पालक मुलांच्या चुका आणि त्यांच्या उणिवा कुटुंबातील इतर सदस्यांसमोर बोलून दाखवतात. यामुळे मुलांना वाईट वाटते किंवा त्यांचा त्यांना त्रास होतो, ज्यामुळे ते पालकांवर चि़डचिड करु लागतात. 

2. तुलना करणे 

अनेकदा नकळतपणे पालक आपल्या मुलांची तुलना करतात. ज्याचा मुलांच्या मनावर खोल आणि सखोल परिणाम होतो. त्यांच्या बालमनावर परिणाम झाल्यामुळे ते पालकांपासून हळूहळू दूर जाऊ लागतात. 

3. भावनांची काळजी घ्या 

बऱ्याचदा मुले पालकांवर रागवतात कारण ते त्यांना समजून घेत नाही. किंवा त्यांच्या भावनांचा आदर करत नाही. मुलांच्या शब्दांकडे गांभीर्याने लक्ष न देणे, त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे. यामुळे मुलांना त्यांचे न ऐकल्यामुळे कमीपणाचे वाटू लागते. 

नोकरी करणाऱ्या आईला मुलांसाठी वेळच मिळत नाही? ५ टिप्स, मनातला गिल्ट पुसा-मुलांसाठी असा काढा वेळ

4. हस्तक्षेप करु नका. 

अनेकदा आई-वडील मुलांच्या चांगल्यासाठी काही गोष्टींपासून दूर राहण्यास सांगतात. परंतु, अनेकदा पालकांचा हस्तक्षेप मुलांच्या बाबतीत वाढू लागतो. त्याच्या खाण्यापिण्यापासून प्रत्येक हालचालीवर अधिक सल्ला देतात. ज्यामुळे मुलांना त्यांच्यावर विश्वास ठेवावासा वाटत नाही. हळूहळू याचे रुपातंर रागामध्ये होऊ लागते. 

5. प्रेमाची थट्टा करणे 

किशोरावस्थेत मुले गेल्यानंतर त्यांच्यामध्ये अनेक भावनिक बदल होत असतात. या काळात मुले प्रेमात देखील पडतात. अशावेळी पालक त्यांचे ऐकण्याऐवजी मुलांवर रागवतात, त्यांना नको तसे बोलतात यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं