बऱ्याचदा असं होतं की एखाद्या प्रसंगी आपण मध्येच काहीतरी बोलून जातो आणि मग त्यानंतर आपल्या सभोवतालचं वातावरण त्यामुळे पुर्णपणे बदलून जातं. आपण असं का बोललो, आपण थोडं शांत बसायला हवं होतं असं नंतर सारखं आपल्याला वाटायला लागतं. पण नंतर असं वाटून काहीही इलाज नसतो. असं आधी बोलून नंतर पश्चाताच करत बसण्यापेक्षा बोलतानाच वेळ पाहून आणि थोडं सांभाळून बोललं तर बरेच प्रश्न अगदी शांततेत मार्गी लागू शकतात. म्हणूनच तर आपल्याकडे अशी म्हणही आहे की 'तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे...' आता हे उगी राहाणं म्हणजे शांत बसणं नेमकं केव्हा करावं ते पाहा...(7 times keep silent at all cost to maintain peace and for healthy relations)
कोणकोणत्या प्रसंगी मौन बाळगणं जास्त महत्त्वाचं आहे?
१. ज्यावेळी आपल्याला खूप भयंकर राग आलेला असतो, त्याप्रसंगी काहीही बोलू नये. कारण रागाच्या भरात आपण खूप जास्त आणि चुकीच्या गोष्टी बोलतो ज्या बोलायला नको होत्या असं आपल्याला नंतर कायम वाटतं.
२. जेव्हा तुम्हाला एखादी घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पुर्णपणे माहिती नसते, तेव्हा त्यावर कोणतंही मत देऊ नका.
३. जर तुमच्या शांत बसण्याने एखादं नात टिकून राहणार असेल तर अशावेळी स्वत:ला आवरा, भावना कंट्राेलमध्ये ठेवा आणि शांत बसा. आपल्या बोलण्याने नाती तुटणार नाहीत, माणसं दुरावणार नाहीत याची काळजी घ्या.
४. जर बोलताना तुमचा आवाज चढणार नाही, तुम्ही आरडाओरडा करणार नाही, शांतपणे तुमचं म्हणणं मांडू शकाल, अशी जेव्हा स्वत:बद्दल खात्री असेल तेव्हाच बोला. नाहीतर शांत राहा.
५. एखाद्याची एक बाजू ऐकून लगेच त्यावर रिॲक्ट करू नका. प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू आधी ऐका आणि मगच तुमचं मत मांडा.
६. जर समोरची व्यक्ती खूप चिडलेली असेल, तर तिला काहीही सांगायला जाऊ नका. त्या व्यक्तीला आधी शांत होऊ द्या आणि मगच तुमचं मत मांडा.
राणी मुखर्जी सांगते जेन अल्फा पिढीच्या लेकीला सांभाळण्याची कसरत, म्हणाली मी तिला खूप घाबरते कारण....
७. समोरच्या माणसाला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, याचा अंदाज घेतल्याशिवाय कधीही बोलू नका. तुमच्या बोलण्याने कदाचित त्याची मतं बदलू शकतात. किंवा तुम्ही अनपेक्षितपणे काहीतरी बोलल्यास परिस्थिती जास्त बिघडू शकते.
