मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या अंजली सोंधियाने UPSC IFS (वन सेवा परीक्षा) २०२४ च्या परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. वयाच्या १५ व्या वर्षी अंजलीचं लग्न ठरलं होतं पण तिची आई तिच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. आईने कुटुंबीयांच्या निर्णयाला विरोध केला आणि लेकीचा साखरपुडा मोडला. याच घटनेने अंजलीच्या आयुष्याला नवं वळण मिळालं. त्यानंतर अंजलीने यशस्वी होऊन नातेवाईकांची बोलती बंद केली.
अंजलीच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर कुटुंबाने वयाच्या १५ व्या वर्षी अंजलीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. पण अशा कठीण परिस्थितीत तिची आई कुटुंबीयांसमोर ढाल बनून उभी राहिली. तिने मुलीला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं. "तू लग्न करणार नाहीस जोपर्यंत तू स्वत:चे निर्णय स्वत: घेत नाहीस" असं म्हटलं. यामुळेच अंजलीला तिचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली.
हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...
अंजलीने २०१६ मध्ये १२ वी नंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. ती अनेक वेळा नापास झाली. २०२१, २०२२ आणि २०२३ मध्ये ती प्रिलिम्समध्ये नापास झाली. पण तिने हार मानली नाही. तिने NCERT, पुस्तकं आणि नोट्स वापरून स्वतः अभ्यास केला. चौथ्या प्रयत्नात तिने IFS परीक्षा उत्तीर्ण झाली. २०२४ मध्ये अंजलीने वन विभाग अधिकाऱ्यांसाठी UPSC IFS (भारतीय वन सेवा) मध्ये ९ वा रँक मिळवला.
Video - बुद्धिबळाची 'राणी'! ८ वर्षांच्या मराठमोळ्या लेकीचा जगभरात डंका; विमानात जंगी स्वागत
इंडिया मास्टरमाइंडच्या रिपोर्टनुसार, अंजली तिच्या प्रवासाबद्दल म्हणते, "मी फक्त १५ वर्षांची असताना त्यांनी माझं नशीब लिहिण्याचा प्रयत्न केला. पण मी ते माझ्या धैर्याने, अश्रूंनी आणि हातात पुस्तके घेऊन बदललं. आज मी यश मुकुटासारखं परिधान करत नाही. तर मी ते एक पुरावा म्हणून दाखवते की कोणताही पिंजरा स्त्रीच्या इच्छाशक्तीपेक्षा मजबूत असू शकत नाही."