महिलांना मासिक पाळी दर महिन्याला येतेच. आता ती किती दिवसांनी येते याचं प्रत्येकीचं गणित वेगवेगळं असतं. कोणाची पाळी अगदी वेळेत येते, तर कोणाची काही दिवस मागे- पुढे होत असते. प्रत्येकीच्या शरीर प्रकृतीनुसार त्यात भेद दिसून येतो. पण सध्या सोशल मीडियावर एक नवीच चर्चा सुरू झाली आहे आणि त्यानुसार मार्च महिन्यात पाळी येणं लांबतं असं म्हटलं आहे. काही जणींनी खरंच हा अनुभव घेतला आहे, तर काही जणींना यात काहीही तथ्य नाही, असं वाटतं. तुम्हालाही असा काही अनुभव आला आहे का? बघा याविषयी एक्सपर्ट काय सांगतात..(is it really true that periods get delayed in march?)
जर्नल ऑफ वुमेन्स हेल्थ आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्या अभ्यासानुसार महिलांना जर पाळी उशिरा येत असेल तर त्यामागे एक कारण असंही असतं की त्या खूप तणावात आहेत. मानसिक ताण वाढला की पाळी उशिरा येते. तसेच हवामानात झालेला बदलही कधी कधी पाळीच्या तारखेत बदल करू शकतो.
उन्हामुळे त्वचा खूप काळवंडून गेली? 'या' पद्धतीने राईस फेशियल करा- टॅनिंग जाऊन चेहऱ्यावर येईल ग्लो
आता मार्च महिन्याचं बोलायचं झालं तर फेब्रुवारी आणि मार्च यादरम्यान वातावरण खूप बदललेलं असतं. हिवाळा जाऊन उन्हाळ्याला चांगलीच सुरुवात झालेली असते. उष्णता वाढलेली असते. त्यामुळे मेलाटोनिन आणि कॉर्टिसॉल या हार्मोन्सचं संतुलनही बिघडतं.
त्याचा ओव्ह्युलेशनवर परिणाम होऊ शकतो. पण याचा परिणाम सगळ्याच महिलांवर होईल असं नाही. त्यामुळे सरसकट सगळ्यांनाचा हा त्रास होऊन त्यांचे मार्चचे पिरियड्स उशिराच येतील असं नाही.
दुपारच्या जेवणानंतर खूप सुस्ती येते? हे नॉर्मल आहे की धोक्याची सूचना? डॉक्टर सांगतात..
पिरियड्स वेळेवर येण्यासाठी तुमची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या सवयी उत्तम असणं गरजेचं आहे. पण तरीही पिरियड्स उशिराच येत असतील तर मात्र एखाद्या महिन्याला त्यासाठी जबाबदार न ठरवता डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक चांगलं.
