काही माणसांना आपण आळशी आहेत असा शिक्का मारुन मोकळे होतो. अर्थात काही जण असतातही तेवढे आळशी. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे हे वाक्य आपण शाळेपासून ऐकत आले आहोत. (You are not lazy, you are sick, the deficiency of 'these' vitamin increases laziness and fatigue.)या वाक्याचा वापर घरी सतत केला जातो. वयानुसार आळस वाढला असेही म्हटले जाते. मात्र प्रत्येक वेळी स्वभावच कारणीभूत असेल असे नाही. काही जण फार अॅक्टिव्ह असतात आणि अचानक त्यांची कामाची गती मंदावते. झोपेचे प्रमाण वाढते. कोणतेही जास्तीचे काम करणे नकोसे वाटायला लागते. हा आळस वाढण्यामागे काही वैद्यकीय कारणेही असू शकतात. एखादा फार आळशी असतो कारण शरीरात कसली तरी कमतरता निर्माण झाली असते. तसेच एखादा शारीरिक त्रास असू शकतो. तसेच मानसिक समस्याही असू शकते.
शरीरातील जीवनसत्त्व 'बी १२' ची कमतरता ही महिलांमधील अगदी सामान्य समस्या आहे. बी १२च्या कमतरतेमुळे सारखी झोप येते. तसेच थकवा जाणवतो. काहीही करावेसे वाटत नाही. शरीरातील प्रथिने कमी झाल्यामुळेही असे होते. तसेच जीवनसत्त्व 'डी' कमी झाल्यामुळेही त्रास होतो. झोप येत राहते आणि आळस वाढतो. लोहाचे प्रमाण संतुलित नसेल तरी शरीर सारखे थकते. अगदी साध्या कृतीनंतरही आरामाची आवश्यकता जाणवते. त्यामुळे एकदा डॉक्टरांकडे जाऊन तपासून या. कोणत्या गुणधर्माची कमतरता आहे ते जाणून घ्या.
महिलांना हार्मोनल असंतुलनामुळे थकवा जाणवतो. या समस्येतून अनेक जणींना जावे लागते. फक्त थकवा नाही तर चिडचिड होते आणि झोप कमी पडते. सतत झोप येत राहते. जांबाई येत राहते. त्यामुळे वैद्यांचा सल्ला गरजेचा आहे. कारण फक्त आळस नाही इतर शारीरिक त्रासही होऊ शकतात.
मानसिक त्रासांमुळेही आळस वाढतो. एखाद्या गोष्टीमुळे जर नैराश्य येत असेल तर कामात रस उरत नाही. काहीही करावेसे वाटत नाही. मानसिक त्रास पटकन व्यक्त करता येत नाहीत आणि ते आपल्यालाही लगेच कळून येत नाहीत. कोणत्या गोष्टीची फार चिंता असली तरी आळस वाढतो. ताणतणावामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो. त्यामुळे आळस वाढायला लागतो.