Join us

Navratri 2025 : नवरात्रीत उपवास करताना पाहा काय काळजी घ्यावी, काय खावे-काय टाळावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:53 IST

Navratri Fasting Tips : नवरात्रीमध्ये (Navratri 2025) उपवास करणार असाल तर आपल्यासाठी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. सोबतच हेही पाहुयात की, उपवास कुणी करू नये.

Navratri Fasting Tips : नवरात्रीचे ९ दिवस सगळीकडे उत्सवाचं वातावरण असणार (Navratri 2025) आहे. गरबा, दांडीयाचा आनंद असतोच, सोबतच बरेच लोक ९ दिवस उपवास करतात. काही लोक निरंकार उपवास करतात, तर काही लोक एक वेळ जेवण किंवा उपवासाचे काहीबाही पदार्थ खातात. उपवास (Fasting) करून पोटाला काही दिवस आराम देणं आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं. आपण नवरात्रीमध्ये उपवास करणार असाल तर आपल्यासाठी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. सोबतच हेही पाहुयात की, उपवास कुणी करू नये.

उपवासात काय खाऊ नये - काय खावे?

तळलेले तेलकट पदार्थ

सामान्यपणे जास्तीत जास्त लोक नवरात्री दरम्यान तळलेले पदार्थ खातात. असं करणं तब्येतीसाठी फारच नुकसानकारक ठरू शकतं. अशात राजगीऱ्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे उपवास केला असल्यास याचा डाएटमध्ये समावेश करावा. त्यासोबतच साबुदाण्याची खिचडी सुद्धा उपवासात खाऊ शकता. दिवसातून केवळ एकदाच काही खाणे टाळा. याने अ‍ॅसिडिटी आणि उलटी होऊ शकते. 

पौष्टीक आहार

या दिवसात आहारात अचानक मोठा बदल झाल्याने याचा शरीरावर प्रभाव पडणार हे तर नक्की आहे. त्यामुळे जे काही खाल त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे कमी तेलाचे पदार्थ खावेत. तसेच दिवसभर हलकं काहीतरी खात रहावं. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भरपूर पाणी प्यावे.

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ज्यूस

उपवास करत असताना शरीराची काळजी घेणं फार गरजेचं असतं. तुम्हाला हवं असेल तर हेल्दी ज्यूस अधिक फायदेशीर ठरतात. व्हिटामिन ए, बी आणि सी असलेली फळं आणि भाज्यांचा ज्यूस तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक तसेच हेल्दी वाटेल. 

चहा-कॉफी टाळा

उपवास केला असताना चहा किंवा कॉफी घेणं टाळा कारण या दोन्हींमध्ये कॅफीन असतं. . तसेच या गोष्टीमुळे रोजची झोप पद्धतही प्रभावित होते. 

उपवास कुणी टाळावा?

- डायबिटीसच्या पेशन्ट्ससाठी वेळेवर जेवण करणं, औषध घेणं गरजेचं असतं. अशात त्यांनी जर उपवास करून शरीराची उपासमार केली तर त्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो.

- हाय ब्लड प्रेशर म्हणजे हाय बीपीच्या रूग्णांनी जर उपवास केला तर त्यांचं बॉडी सिस्टम बिघडू शकतं. उपवास केल्याने त्यांना अधिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

- ज्यांची अलिकडेच सर्जरी झाली आहे, त्यांनीही उपवास करणं टाळावं. सर्जरी झाल्यानंतर जखम सुकण्यासाठी बॉडीला आवश्यक व्हिटामिन आणि मिनरल्सची गरज असते.

- ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे, त्यांनी उपवास करू नये. उपवास केल्यास अशांना शरीरात कमजोरी आणि थकवा अधिक जाणवू शकतो.

- डायबिटीस आणि हृदयरोग असलेल्या रूग्णांना आपल्या खाण्या-पिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. जर हे रूग्ण जास्त वेळ उपाशी राहत असतील त्यांची तब्येत बिघडू शकते.

- गर्भवती महिलांना व्हिटामिन्स आणि मिनरल्सची गरज असते. जर यादरम्यान त्यांनी उपवास केला तर अशाने माता आणि तिच्या बाळावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांनीही उपवास करू नये. 

टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव २०२५नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४हेल्थ टिप्स