पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो. परंतु या ऋतूमध्ये अनेक आजार देखील उद्भवतात. दूषित पाण्यामुळे अनेक आजार वाढतात.(rainy season health care tips) पावसाळ्यात लहान मुले आणि वयोवृद्ध असणारी माणसं लगेच आजारी पडतात.(malaria protection tips naturally) इतकेच नाही तर आपल्याला या काळात चांगल्या आहारासह, स्वच्छ पाणी, हलका व्यायाम करणे देखील महत्त्वाच आहे. (monsoon diet for strong immunity) पावसाळ्यात सर्दी-ताप आणि खोकल्याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाण्याचे तळे पाहायला मिळतात यामुळे साथीच्या रोगासह मलेरिया आणि डेंगूचा आजार देखील वाढतो.(avoid mosquito-borne diseases naturally) दूषित पाण्यामुळे अनेक संसर्गजन्य आजार वाढतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते त्या लोकांना या आजाराचा धोका सर्वाधिक असतो.(monsoon immunity boosting tips) रोगप्रतिकारशक्ती चांगले असेल तर ती आपल्याला अनेक संसर्गजन्य आजाराशी लढण्यास मदत करते. जर आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर आपण नैसर्गिकरित्या ती वाढवू शकतो. योग्य प्रकारचा आहार घेतला तर रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते. पावसाळ्यात आपला आहार कसा असायला हवा जाणून घेऊया.
२ मिनिटांत ओळखा ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे, साधे वाटणारे दुखणे असते गंभीर - वेळीच घ्या काळजी
1. पावसाळ्यात आपण आहारात हंगामी फळांचा समावेश करायला हवा. ज्यामुळे शरीराला योग्य पोषणतत्व मिळेल. पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायची असेल तर आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेली फळे खा. आहारात सफरचंद, पेर, बेरी, मनुका, पपई, डाळिंब, चेरी, लिची आणि केळी यांसारखी फळे खा.
2. पावसाळ्यात बाजारात अनेक रानभाज्या आणि हिरव्या भाज्या येतात. भाज्या खाण्यापूर्वी त्या नीट स्वच्छ करुन मगच खा. आपल्या ताटात कारले, दुधीभोपळा, काकडी, बिन्स, भेंडी आणि टोमॅटो यांसारख्या भाज्यांचा समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य निरोगी राहिल तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल.
3. स्वयंपाकघरात असणारे मसाले आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यासाठी आहारात आपण लसूण, आले, हळद, वेलची, जायफळ, काळीमिरी आणि दालचिनीसारखे मसाले आहारात असायला हवे. यामध्ये बॅक्टेरियाविरोधी, दाहक-विरोधी, अँटीव्हायरल, अँटीमायक्रोबिल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत.
कुरकुरीत कांदा भजी लगेच मऊ पडतात? पीठ कालवताना ‘इतकंच’ करा, भर पावसात भजी सादाळणार नाहीत..
4. हर्बल टी आपली रोगप्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्य देखील वाढवू शकते. दररोज आले किंवा तुळशीचा हर्बल चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
5. ड्रायफ्रुट्स हे प्रत्येक ऋतूमध्ये खायला हवे. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे पेशी निरोगी ठेवू शकतात. ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.