अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा माजी पती उद्योजक संजय कपूर यांचं नुकतंच काही दिवसांपूर्वी निधन झालं. सुरुवातीला हार्ट ॲटॅक आल्यामुळे संजय कपूर यांचं निधन झालं असं बोललं गेलं. पण हार्ट ॲटॅक येण्याच्या काही मिनिटे आधी त्यांच्या तोंडात मधमाशी गेली होती. ती कदाचित त्यांच्या छातीत चावली असावी आणि त्यानंतर त्यांना हार्ट ॲटॅक आला असं बोललं जातं. अतिशय दुर्दैवी असणाऱ्या या घटनेमुळे सर्वसामान्यांच्या मनात मधमाशीविषयी भीती निर्माण झाली आहे (Karisma Kapoor's Ex Husband Sanjay Kapoor's Death). म्हणूनच मधमाशीचा दंश झाल्यावर शरीरात नेमके कोणते बदल होत जातात, तो कितपत धोकदायक, जीवघेणा ठरू शकतो, याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती..(4 things that can happen to the body when a bee stings you)
मधमाशी चावल्याने आरोग्यावर नेमका कोणता परिणाम होतो?
१. मधमाशी चावल्यावर लगेचच पुढच्या काही मिनिटांत शरीरात काय बदल होत जातात, याविषयी डॉ. सी. एम. नागेश यांनी दिलेली माहिती इंडियन एक्सप्रेसने प्रकाशित केली आहे. या माहितीनुसार मधमाशी चावल्यानंतर शरीरावर लगेचच सूज येते. डॉक्टर असेही सांगतात की मधमाशी चावणे हे हार्ट ॲटॅक येण्याचे एकमेव कारण असू शकत नाही.
सफरचंदवर लवंग खोचून खाण्याचे फायदे माहिती आहेत? २ आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी जणू अमृतच..
२. काही जणांना मधमाशी चावल्याने तात्पुरत्या वेळेपुरतं बीपी कमी होण्याचाही त्रास होऊ शकतो. पण ते अजिबातच जीवघेणं नसतं.
३. जर एकावेळी अनेक मधमाशांनी तुमच्या शरीरावर हल्ला केला आणि एकापेक्षा जास्त मधमाशा तुम्हाला चावल्या तर ते मात्र त्रासदायक ठरू शकतं. यामुळे किडनीवर परिणाम होऊन लघवीमधून रक्त जाण्याचाही त्रास होऊ शकतो.
टु व्हिलर चालवून हात खूप टॅन होतात? फक्त ४ पदार्थ घेऊन हाताला लावा, हात उजळतील
४. काहीजणांच्या बाबतीत श्वसन मार्गाला सूज येणे, गुदमरल्यासारखे वाटणे, रक्तदाब कमी होणे असाही त्रास होऊ शकतो.