भारतात ९० टक्के रुग्ण हे मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त आहे. यामध्ये अनेक वयोगटातील लोकांचा समावेश आहे. हल्ली मधुमेहाचा आजार हा बाळ जन्माला येण्याआधीच समजून येतो. (Ayurvedic treatment for diabetes) पूर्वी मधुमेह हा प्रोढ वयातील लोकांना असायचा, परंतु याचे प्रमाण आता झपाट्याने वाढताना दिसत आहे. (Natural remedies for blood sugar control) खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयी, झोपेची वेळ अधिकचा ताण यामुळे आरोग्यावर परिणाम होतो, ज्यामुळे मधुमेहासारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. (how to control blood sugar)
जर आपल्याही घरात मधुमेहाचे रुग्ण असतील तर आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागते. त्याच्या खाण्यापिण्यापासून ते इतर गोष्टींमध्ये आपल्याला अधिक प्रमाणात बदल करावा लागतो. (joint pain issue) रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आपण आयुर्वेदिक औषधांची मदत घेऊ शकतो. ही औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण गोड खाण्याचे प्रमाण कमी करतो. (Blood sugar management with Gymnema Sylvestre) परंतु, आयुर्वेदात अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे झरझर वाढणारी रक्तातील साखर आटोक्यात येऊ शकते. शार्दुनिका अर्थात बेडकीचा पाला ही औषधी वनस्पती मधुमेहांसाठी संजीवनी आहे. याला योग्य प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात.
'या' ४ चुकांमुळे पाठदुखी-कंबरेचा होतो त्रास, तासन्तास लॅपटॉपवर बसून करताय काम? बघा काय करायचे
गोड खाण्याची लालसा कमी करणारं पान
बेडकीच्या पाल्यामध्ये क्लोरोफिल, रेझिन आणि यांसारखे अधिक महत्त्वाचे घटक असतात. जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. जर आपल्याला सतत गोड खाण्याची लालसा होत असेल तर याची पाने चावून खायला हवी. यात असणारे आम्लाचे सक्रिय संयुगे आपल्या शरीरातील साखरचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. या पानांना चावून खाल्ल्याने दोज खाण्याची इच्छा हळूहळू कमी होते. याची चव कडू असते. त्यामुळे ५ सेकंद जीभेवर ठेवताच गोड खाण्याची इच्छा कमी होईल. याची पावडर रोज सकाळी खाल्ल्याने देखील साखरेची पातळी नियंत्रणात राहिल.
बेडकीच्या पाल्याचा फायदा
1. बेडकीचे पान चावून खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो. यात असणारे संयुगे शुगर कंट्रोल करतात.
2. जर सतत जळजळ किंवा शरीर सूजत असेल तर याची पाने चावून खावीत.
3. दमा किंवा श्वसनासंबंधित समस्या असल्या तर ही पाने फायदेशीर ठरतात.
4. अल्सरची समस्या दूर करण्यासाठी बेडकीची पाने महत्त्वाची आहेत.
5. मासिक पाळीदरम्यान अतिरक्तस्त्राव होत असेल तर या पानांचा फायदा होतो.
6. त्वचेचे विकार, पाठ, कंबर आणि सांधेदुखीसाठी ही पाने बहुगुणी ठरतात.