पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पावसाळ्यात आपल्याला अनेक समस्या सतावतात, यातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे गढूळ पाणी. विशेषतः या ऋतूंत जोरदार पावसामुळे नद्यांचे, तलावांचे व विहिरींचे पाणी गढूळ होते. अनेकदा शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाईनमध्येही गळतीमुळे माती किंवा धूळ मिसळते आणि घरपोच येणारे पाणी अशुद्ध व गढूळ होते. पावसाळ्यात वारंवार येणारं गढूळ पाणी आरोग्यासाठी धोकादायक ठरते कारण त्यामध्ये (Best Utensil To Store & Drink Water According To Ayurveda To Filter Without RO Shared By Acharya Tanmay Goswami) हानिकारक जंतू, बॅक्टेरिया, विषाणू असण्याची शक्यता असते. या पाण्यामुळे गॅस्ट्रोएन्टेरिटिस, पोटदुखी, अतिसार, टायफॉईड, कॉलरा यांसारख्या रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात पाणी उकळून प्यायले जाते किंवा चांगल्या फिल्टरचा वापर केला जातो(Best Utensils to Store & Drink Water According to Ayurveda Without RO).
आजकाल बहुतेक घरांमध्ये आरओ फिल्टर बसवले जातात, जेणेकरून शुद्ध पाणी मिळेल. परंतु आपल्याकडे काही असे नैसर्गिक फिल्टरही आहेत, जे कोणतीही मशीन न वापरता पाण्यातील हानिकारक घटक नष्ट करू शकतात. आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य तन्मय गोस्वामी यांच्या मते, कोणत्या भांड्यातून पाणी पितो याचा आपल्या शरीरावर मोठा परिणाम होतो. याचबरोबर त्यांनी पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध करण्यासाठी ते नेमके कोणत्या धातूच्या भांड्यातून प्यावे याबद्दल अधिक माहिती सांगितली आहे.
आयुर्वेदानुसार स्टीलच्या भांड्यातून पाणी पिणे टाळावे कारण...
आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य तन्मय गोस्वामी यांच्यामते, स्टीलच्या भांड्यातून कधीच पाणी पिऊ नये. असे पाणी शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. आयुर्वेदाच्या दृष्टीने स्टीलचे भांडे शरीरातील त्रिदोषांमध्ये असंतुलन निर्माण करते, ज्यामुळे पचनतंत्र बिघडू शकते तसेच इतर विकार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे माती, तांबे किंवा कांस्य धातूंपासून तयार झालेल्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर मानले जाते.
तांब्याचे भांडे आहे फायदेशीर...
पूर्वीच्या काळी पाणी पिण्यासाठी नेहमी तांब्याच्या भांड्याचा वापर केला जात असे. परंतु बदलत्या काळानुसार, हळूहळू ही पद्धत जुनी होत गेली आणि स्टील, प्लास्टिकसारख्या इतर भांड्यांचा वापर वाढला. मात्र आयुर्वेदाचार्यांच्या मते पिण्याचे पाणी नेहमी तांब्याच्या भांड्यातच साठवून ठेवले पाहिजे. तांब्याच्या भांड्यात साठवून ठेवलेल्या पाण्यात हानिकारक सूक्ष्मजीव वाढत नाहीत, त्यामुळे ते पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध राहते. तांबे शरीरातील अनेक दोष दूर करण्यास मदत करते, पचनक्रिया सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. त्यामुळे आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे फायदेशीर मानले जाते.
Yoga Day 2025 : ७ देखण्या-सुडौल मराठी अभिनेत्री, रोज करतात योग आणि दिसतात सुपरफिट!
मातीची भांडी देखील आहेत उपयुक्त...
तांब्याच्या भांड्यासोबतच, पाणी मातीच्या माठात साठवणं हा देखील उत्तम पर्याय आहे. मातीच्या माठातील पाणी तहान भागवण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि हे पाणी शरीराचं तापमान नैसर्गिकरीत्या थंड ठेवतं. यासोबतच पचनतंत्र सुधारण्यात मदत करतं आणि अॅसिडिटी व पोट फुगण्यासारख्या समस्या कमी करतं. त्यामुळे पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.
जिमला न जाताही समीरा रेड्डी इतकी फिट! पाहा, चक्क घरातील वस्तूंनीच कसा करते व्यायाम...
स्फटिक आणि कॅट्स आय...
आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य तन्मय गोस्वामी यांच्यामते, याशिवाय अजून दोन महागडी भांडी देखील आहेत, ज्यामध्ये पाणी साठवता येते. तज्ज्ञांच्या मते, स्फटिक क्रिस्टलच्या भांड्यात ठेवलेले पाणी अमृतासारखे शुद्ध आणि ऊर्जा वाढवणारे असते. तसेच, 'कॅट्स आय' या महागड्या दगडाच्या भांड्यात देखील आपण पाणी साठवू शकता. असे पाणी शरीराला सकारात्मक ऊर्जा देण्यास आणि मानसिक स्थैर्य वाढवण्यास मदत करते, असे मानले जाते. मात्र अशी भांडी अत्यंत दुर्मिळ आणि महागडी असतात, म्हणूनच सर्वसामान्य लोकांमध्ये त्याचा फारसा वापर होत नाही. अशा भांड्यातून पाणी प्यायल्यास ते शुद्ध होते त्याला वेगळे शुद्ध करण्याची गरज भासत नाही.
याशिवाय काचेच्या भांड्यातही पाणी साठवले जाऊ शकते आणि काचेच्या ग्लासमधून पाणी पिणे योग्य ठरेल. काचेचं भांडं स्टीलच्या भांड्यांपेक्षा अधिक सुरक्षित आणि फायद्याचं मानलं जातं. कारण काचेत कोणतीही रासायनिक प्रतिक्रिया होत नाही, त्यामुळे पाण्याची शुद्धता टिकून राहते.
परंतु प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर पिण्यासाठी कधीच करू नये, असं तज्ज्ञ सांगतात. प्लास्टिकमध्ये असलेले रसायन पाण्यात मिसळून आरोग्यास हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पाणी साठवण्यासाठी किंवा पिण्यासाठी प्लास्टिकच्या भांड्यांचा विचारही करू नये. अशाप्रकारे, आपण या वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यात पाणी साठवून ठेवल्यास त्याची शुद्धता टिकून राहते.