सध्याच्या बिझी आणि धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये महिलांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या सतावतात. महिलांच्या आरोग्याच्या अनेक तक्रारींपैकी फारच कॉमन पण त्रासदायक (Ayurvedic Home Remedy For Heel Pain) वाटणारी समस्या म्हणजे टाचदुखी. दिवसभर उभं राहणं, घरकाम, सतत चालणं (Heal Heel Pain Faster with Ayurveda) किंवा चुकीचे चपला, सॅंडल वापरणं या कारणांमुळे टाचांवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे दुखणं (Home Remedies For Heel Pain) सुरू होतं. टाचदुखी सुरु झाल्यावर अनेकजणी या समस्येला अगदीच किरकोळ समजून उपचार करण्यासाठी कानाडोळा करतात(Heal your Heel Pain with Ayurveda).
सुरुवातीला हा त्रास दुर्लक्ष केला जातो, पण जसजसा वेळ जातो तसतसं हे दुखणं वाढत जातं आणि चालताना, जमिनीवर पाय ठेवताना प्रचंड वेदना होतात. विशेषतः चाळिशी ओलांडलेल्या महिलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. खरंतर, टाचदुखीची कारणं, लक्षणं आणि उपाय जाणून घेणं आवश्यक ठरतं, जेणेकरून हा त्रास लवकरात लवकर कमी करता येतो. टाचदुखी कमी करण्यासाठी अनेकजणी घरगुती उपाय करण्यावरच अधिक भर देतात. टाचदुखी कमी करण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील खास पारंपरिक असा उपाय कोणता ते पाहूयात...
टाचदुखी कमी करण्यासाठी पारंपरिक उपाय...
टाचदुखी कमी करण्यासाठी आयुर्वेदात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय सांगितले आहेत, त्यापैकीच हा एक खास उपाय. shrivishwaayurveda या इंस्टाग्राम अकाऊंटवरून टाचदुखी कमी करण्यासाठी काय करावं यासाठी खास उपाय सांगितला आहे.
टाचदुखी कमी करण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील अस्सल घरगुती पारंपरिक उपाय करण्यासाठी आपल्याला २ टेबलस्पून हळद, २ टेबलस्पून खोबरेल तेल, २ ते ३ टेबलस्पून पाणी व २ रुईची पाने इतकंच साहित्य लागणार आहे.
बागेतील 'या' हिरव्यागार पानांचा करा हेअर मास्क! केसांसाठी वरदान, दिसतील सुंदर-वाढतील भरभर...
सलमान खानच्या ट्रेनरने सांगितले सेलिब्रिटी फिटनेस सिक्रेट! रोज करतात ३ गोष्टी, दिसतात देखणे..
हा उपाय करण्यासाठी नेमकं काय करावं ?
एका भांड्यात हळद घेऊन त्यात प्रत्येकी २ ते ३ टेबलस्पून पाणी व खोबरेल तेल ओतावे. त्यानंतर चमच्याच्या मदतीने हे सगळे जिन्नस एकत्रित कालवून घ्यावे आणि त्याची थोडी घट्टसर अशी पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट २ ते ३ सेकंद गॅसच्या मंद आचेवर हलकेच गरम करून घ्यावी. त्यानंतर, रुईची २ पाने घेऊन त्यांना खोबरेल व्यवस्थित पसरवून लावावे. ही तेल लावलेली रुईची पाने तव्यावर हलकी गरम करून घ्यावी. ही पाने गरम असतानाच त्यावर तयार हळदीची पेस्ट पसरवून लावावी. मग असे पान टाचेवर धागा किंवा चिकटपट्टीच्या मदतीने बांधून घ्यावे. ही पाने अर्धा ते एक तास टाचांवर तशीच राहू द्यावीत.
जास्वंदीचे लालबुंद फुल करते त्वचेवर जादू! त्वचेच्या सगळ्या समस्यांवर गुणकारी सुंदर औषध...
हा उपाय नियमितपणे सलग न चुकता ५ ते ६ दिवस केल्यास हळूहळू फरक जाणवू लागेल. शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करणे फायदेशीर ठरेल व यामुळे टाचदुखीचे प्रमाण कमी होऊन आराम मिळेल. आयुर्वेदानुसार, रुईची पाने टाचदुखी कमी करून टाचेची सूज व वेदना कमी करतात. याचबरोबर, हळद शरीरातील दाह कमी होतो आणि हाडे व सांधे बळकट होतात. टाचदुखीवर हा साधासोपा आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक पण असरदार उपाय नक्की करुन पाहाच.