'चक दे इंडिया' सिनेमातील विद्या माळवदे भलेही आता जास्त सिनेमात दिसत नसली तर सोशल मीडियावर तिचे भरपूर फॅन्स आहेत. ५२ वर्षांची झाली असूनही ती ३० वयाची दिसते. विद्याची लाइफस्टाईल आणि डाएट याला कारणीभूत आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून विद्या नेहमीच आरोग्यासंबंधी वेगवेगल्या टिप्स देत असते. अशात विद्यानं एक व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यात तिनं सांगितलं की, ती दिवसाची सुरूवात कशी करते. सोबतच विद्यानं मलासन करून पाणी पिण्याचे फायदेही सांगितले आहेत. पण ती हे करताना साधं पाणी पित नाही, त्यात एक खास गोष्ट टाकते.
मलासन करताना करते ऊषापान
आयुर्वेदात ऊषापानला (सकाळी पाणी पिण्याची प्रक्रिया) अधिक महत्वं आहे. मलासनात ऊषापान करणं म्हणजे पाणी प्यायल्यानं आरोग्याला अनेक फायदे मिळतात. विद्या सकाळी उठून आधी मसालनात बसले आणि गरम पाण्यात तूप टाकून पिते. विद्यानं सांगितलं की, मलासनात बसल्यावर हिप मोबिलिटी वाढते, लोअर बॉडीची स्ट्रेंथ वाढते, रिलॅक्स वाटतं आणि डायजेशन चांगलं होतं.
गरम पाण्यात तूप टाकून पिण्याचे फायदे
विद्यानं सांगितलं की, गरम पाण्यात तूप टाकून प्यायल्यास तुपातील हेल्दी फॅट ॲसिडमुळे पचन सुधारते. तूप टाकून पाणी प्यायल्यास पोट सहजपणे साफ होतं.
दात कसे स्वच्छ करते विद्या?
विद्या रोज सकाळी गंडूषा म्हणजेच ऑइल पुलिंग करते. यासाठी ती तोंडात तेल टाकते आणि काही मिनिटं फिरवते. त्यानंतर तेल थुंकते. त्याशिवाय मीठ आणि हळदीच्या पाण्यानं गुरळा करते आणि त्यानंतर दात स्वच्छ करून जिभही साफ करते.
योगाआधी..
योगा करण्याआधी अश्वगंधा, शतावरी, कडूलिंब आणि शेवग्याची गोळी खाते. अश्वगंधानं स्ट्रेस, एंझायटी कमी होते, स्टॅमिना वाढतो आणि झोपही चांगली येते. शतावरीनं फिजिकल आणि इमोशनल स्ट्रेस कमी होतो, तसेच कोलेस्टेरॉल कमी होतं आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो. तसेच शेवग्यानं व्हिटामिन मिळतात.