हल्ली बहुतांश वयस्कर व्यक्तींना निद्रानाशाचा त्रास होत आहे. दिवसभर काम करून कितीही थकलं तरी या व्यक्तींना रात्री शांत झोप लागत नाही. मध्यरात्रीपर्यंत ते जागेच असतात. त्यानंतर कधीतरी डोळा लागतो, पण लगेचच जाग येते. त्यामुळे शांत झोप होत नाही. रात्रीची झोप पुरेशी आणि शांत झाली नाही तर मग त्याचा सगळा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसून येतो. थकवा, आळस आल्यासारखं होतं. डोळे जड पडतात. अपुऱ्या झोपेमुळे तब्येतही बिघडते, वजन वाढते, हार्मोन्सचे संतुलन बिघडते. असा सगळा त्रास टाळायचा असेल तर शांत झोप होणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करावं याविषयी आहारतज्ज्ञांनी शेअर केलेली ही माहिती एकदा बघा (3 simple ayurvedic remedies for sound and calm sleep, what to do for sound sleep in night?)
रात्री लवकर आणि शांत झोप येण्यासाठी काय उपाय करावे?
वाढत्या वयासोबत रात्रीची झोप कमी झाली असेल तर काय उपाय करावे, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी sehatnamawithrajinder या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एकूण ३ उपाय सांगितले आहेत.
भात खाल्ल्यावर कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती वाटते? बघा भाताचा आणि कोलेस्टेरॉलचा नेमका काय संबंध
१. पहिला उपाय म्हणजे उजवी नाकपुडी बंद करावी आणि फक्त डाव्या नाकपुडीनेच श्वास घ्यावा आणि सोडावा. रात्री जेव्हा तुम्ही झोपण्यासाठी अंथरुणावर बसाल तेव्हा हा उपाय करा. तुम्हाला जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत याच पद्धतीने श्वास घ्यावा आणि सोडावा. असं तुम्ही जेव्हा सलग काही वेळ कराल तेव्हा तुमचं मन आणि डोकं शांत, रिलॅक्स होण्यास मदत होईल आणि लवकर झोप लागेल.
२. दुसरा उपाय म्हणजे तिळाचं तेल थोडं गरम करा आणि त्याने तळपायांना गोलाकार पद्धतीने मसाज करा. आपल्या मेंदूशी संबंधित काही पॉईंट्स तळपायात असतात. तळपायांना मसाज केल्यामुळे ते पॉईंट्स व्यवस्थित दाबले जातात आणि त्यामुळे डोकं शांत होण्यास मदत होते.
काय सांगता जिलेबी खाण्याचे खूप फायदे आहेत? बघा जिलेबीमध्ये अशी काय जादू असते...
३. तिसरा उपाय म्हणजे कास्याच्या वाटीने तळपायांना मसाज करणे. हा उपाय करण्यासाठी गायीचं तूप थोडं गरम करून घ्या. वाटीच्या पृष्ठभागाला तूप लावा आणि मग ती वाटी तळपायांवर घासा. यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या झोपेवर दिसून येतो.