Lokmat Sakhi >Food > भाजीत मसाले किंवा मीठ जास्त झाले तर काय कराल? 3 सोप्या टिप्स, पदार्थ बिघडणार नाही..

भाजीत मसाले किंवा मीठ जास्त झाले तर काय कराल? 3 सोप्या टिप्स, पदार्थ बिघडणार नाही..

reduce salt in vegetables: cooking mistakes and quick fixes: पदार्थांतील तिखटपणा कमी करण्यासाठी शेफ पंकजा यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2025 18:05 IST2025-06-20T18:00:00+5:302025-06-20T18:05:01+5:30

reduce salt in vegetables: cooking mistakes and quick fixes: पदार्थांतील तिखटपणा कमी करण्यासाठी शेफ पंकजा यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहे.

too much masala in sabzi solution how to fix salty curry cooking tips to balance flavors fix over-spiced food easily | भाजीत मसाले किंवा मीठ जास्त झाले तर काय कराल? 3 सोप्या टिप्स, पदार्थ बिघडणार नाही..

भाजीत मसाले किंवा मीठ जास्त झाले तर काय कराल? 3 सोप्या टिप्स, पदार्थ बिघडणार नाही..

भाजी छान, खमंग आणि टेस्टी होण्यासाठी त्यात आपण अनेक जिन्नस वापरतो. चव वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करतो.(Cooking tips) पाहायला गेलं तर प्रत्येक पदार्थांनुसार विविध मसाले घातले जातात. हळद, मीठ, लाल तिखट, काश्मिरी लाल मसाला , आमटी मसाला , गोडा-काळा मसाला, भाजी मसाला हे मासेल आपण रोजच्या जेवणात अगदी योग्य पद्धतीने वापरतो. (how to fix salty curry)
अनेकदा नवीन रेसिपी ट्राय करताना भाज्यांमध्ये मसाल्याचे प्रमाण जास्त होते.(too much masala in sabzi solution) मसाले जसे पदार्थांना चव आणण्याचे काम करतात तसेच त्यांचे प्रमाण जास्त झाले की, चव देखील बिघडू शकते. अनेकदा कामाच्या गडबडीत स्वयंपाक करताना आपल्या लक्षात येत नाही.(kitchen hacks for extra salt) कधी मीठ जास्त पडते तर कधी मसाले.(fix over-spiced food easily) अशावेळी तयार केलेला पदार्थ वाया जाण्याची शक्यता जास्त असते. जेवणात चुकून मसाले जास्त झाले की काय करावं असा प्रश्न गृहिणींना पडतो. पण पदार्थांतील तिखटपणा कमी करण्यासाठी शेफ पंकजा यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहे.(cooking tips to balance flavors) ज्याच्या मदतीने आपण पदार्थांमधील तिखटपणा कमी करु शकतो. (Indian food salt correction tips)

मुलांचा डबा होईल फस्ट क्लास! करा हेल्दी टेस्टी हराभरा कबाब, खातील पोटभर- खमंग पौष्टिक पदार्थ

1. शिजवलेल्या भाज्या किंवा कोणत्याही पदार्थातील गरम मसाला कमी करण्यासाठी आपण सगळ्यात आधी एका प्लेटमध्ये लिंबू पिळून घ्या. त्यात साखर आणि तूप घाला. तयार भाजी हे मिश्रण घाला. भाजी गरम करुन उकळी आल्यानंतर त्याची चव घ्या. पदार्थातील मसाल्यांची चव कमी होईल. 

2. पिष्टमय पदार्थ मसाल्यांची जास्त प्रमाणातील चव शोषून घेतात. अशावेळी आपण एक किंवा दोन उकडून मॅश केलेले बटाटे घाला आणि शिजवून घ्या. यामुळे मसाल्यांची चव कमी होईल. बटाट्याऐवजी आपण ब्रेड स्लाईस घालू शकतो. जे पदार्थांची चव शोषून घेतात. ब्रेड घातल्यानंतर काही वेळा लगेच बाहेर काढा. 

जवस-तिळाची चटणी खा रोज, महिलांच्या सर्व आजारांवर गुणकारी! हाडांची दुखणी-बद्धकोष्ठतेचा त्रास होईल कमी

3. भाजीमध्ये मसाले जास्त झाल्यास त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तांदळाचा उपयोग करा. ग्रेव्हीची भाजी असेल तर त्यात कच्चे तांदूळ एका लहान कापडी पॅकेटमध्ये घालून ठेवा. तांदूळ अतिरिक्त मसाले आणि ओलावा शोषून घेईल. नंतर ही तांदळाची पोटली बाहेर काढा. 

4. दुग्धजन्य पदार्थ मसाल्यांच्या तिखटपणा कमी करण्यास मदत करतात. आपण ग्रेव्हीच्या भाजीमध्ये १ ते २ चमचे ताजे दही, क्रीम किंवा नारळाचे दूध घालू शकता. दही किंवा क्रीम घालताना फेटून मगच घाला. दही घालताना गॅस मंद आचेवर ठेवा. याशिवाय थोडे तूप किंवा बटर घातल्याने मसाल्यांची चव कमी होऊ शकते. 

 


Web Title: too much masala in sabzi solution how to fix salty curry cooking tips to balance flavors fix over-spiced food easily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.