Join us

कधी हिरवे मीठ खाल्ले आहे का? जेवणाची चव वाढवणारं उत्तराखंडातलं खास मीठ, ही चवच अद्भूत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2025 18:10 IST

Have you ever eaten green salt? This special salt from Uttarakhand that enhances the flavor of food : अनेक राज्यांमध्ये वापरले जाते हे हिरवे मीठ. पाहा कसे तयार कराल. ताकाची तर चवच बदलून टाकेल.

काही पदार्थ असेही असतात ज्यांच्या बद्दल आपण ऐकलेही नसते मात्र इतर कोणत्या तरी राज्यामध्ये तो पदार्थ फार प्रसिद्ध असतो.  (Have you ever eaten green salt? This special salt from Uttarakhand that enhances the flavor of food)भारतातील अशा अनेक पदार्थांची यादी काढता येईल जे सर्वांना माहिती नसतात मात्र त्या देशात फार लोकप्रिय असतात. असाच एक पदार्थ उत्तराखंडमध्ये तयार केला जातो. हिमाचलप्रदेशमध्ये घरोघरी हा पदार्थ तयार केला जातो. (Have you ever eaten green salt? This special salt from Uttarakhand that enhances the flavor of food)या पदार्थाला हरा नमक असे म्हटले जाते. हिरवे मीठ कधी पाहिले आहे का? साध्या मीठाऐवजी कधी तरी हे मीठ वापरून बघा. 

हे हिरवे मीठ कुमाऊ तसेच गढवा यांसारख्या भागांमध्ये तयार केले जाते. चाट मसाल्या प्रमाणे याचा वापर केला जातो. याला पिस्यू लून असेही नाव आहे. साध्या मीठाऐवजी हे असे तिखट मीठ अनेक राज्यांमध्ये वापरले जाते. फळांवर टाकायला वापरले जाते. तसेच पापडावर आणि इतरही पदार्थांवर टाकायला वापरतात. हा पदार्थ तयार करायला फारच सोपा आहे बरेच दिवस टिकतो. पदार्थांची चव वाढवतो. पाहा कसे तयार कराल. 

साहित्यहिरवी लसूण(लसणाच्या रोपाचा पाला बाजारात मिळतो), कोथिंबीर, आलं, मीठ, हिरवी मिरची, जिरं

कृती१.  लसणाचा पाला अगदी बारीक चिरुन घ्या. कोथिंबीर घ्या ती ही बारीक चिरा. काही हिरव्या मिरच्या घ्या अगदी बारीक तुकडे करून घ्या.

२. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घ्या. तसेच लसणाचा पाला आणि हिरव्या मिरचीचे तुकडेही घ्या. त्यामध्ये जिरे घाला. आल्याचे बारीक तुकडे घाला. नेहमी आपण चवीपुरते मीठ वापरतो मात्र ही रेसिपी मीठाचीच असल्याने मीठ भरपूर वापरा. 

३. सगळं छान वाटून घ्या. त्यामध्ये पाणी अजिबात वापरू नका. सुकेच वाटा. पाला धुतल्यावरही तो सुकवून घ्या. पाणी राहिले तर मीठ टिकणार नाही.

४. सगळं वाटून झाल्यावर ते वाळवून घ्यायचे. एअरफ्रायर वापरा नसेल तर दोन दिवस उन्हामध्ये ठेवा. वाळल्यावर त्याचा भुगा करून घ्या.

ताकामध्ये तर हे मीठ फारच चविष्ट लागते. तसेच भाजीमध्येही वापरू शकता.

टॅग्स :अन्नपाककृतीभारत