Join us  

Food Tips : रोजच्या जेवणात खिचडी खाल्ल्यानं असा होतो फायदा; ५ आजारांपासून कायमचे लांब राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 4:19 PM

Food Tips : पोट खराब असल्यास, झटपट काहीतरी बनवायचं असल्यास खिचडी हा चांगला पर्याय आहे. खिचडीच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

ठळक मुद्देलोक संतुलित आहार घेण्यासाठी डाळी, भाज्या, चपाती आणि भात स्वतंत्रपणे बनवतात. यामध्ये त्यांचा बराचसा वेळ अशा प्रकारे घालवला जातो. पण जर तुमच्याकडे स्वयंपाकासाठी जास्त वेळ नसेल तर खिचडी बनवणे ही नक्कीच चांगली कल्पना आहे.तुम्ही कधीतरी खिचडी बनवत असाल तर बासमती तांदूळ  घ्या. तांदूळ चांगला धुवून घ्यावा. आणि किमान अर्धा तास तो पाण्यात भिजवावा. यामुळे तांदूळ नरम होतात. आणि जेव्हा ते शिजवतो तेव्हा पाणी शोषण्याची क्षमता कमी होते.

भारतातील लोकप्रिय पदार्थांपैकी एक म्हणजे खिचडी. खिचडी तयार करताना  वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि भाज्यांचा वापर केला जातो. खिचडीत जास्त मसाल्यांचा वापर केला जात नाही पण त्याची चव अप्रतिम असते. पोट खराब असल्यास, झटपट काहीतरी बनवायचं असल्यास खिचडी हा चांगला पर्याय आहे.  खिचडीच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

खिचडी खाण्याचे फायदे

वात, पित्त आणि कफ दोष दूर होतात

खूप कमी लोकांना हे माहीत असेल की खिचडी हा आयुर्वेदिक आहाराचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. खिचडीचे नियमित सेवन केल्याने वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन साधण्यास मदत होते. एवढेच नाही तर शरीराला डिटॉक्सिफाय करण्याबरोबरच ते आपल्या शरीराची ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते.

उर्जा, पोषण मिळते

मसूर, तांदूळ, भाज्या आणि विविध मसाल्यांनी तयार केलेली खिचडी दिसते तितकीच पौष्टिक आहे. खिचडीमध्ये असलेले पोषक घटक आपल्या शरीराला ऊर्जा आणि पोषण देण्याचे काम करतात. खिचडीचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीराला सर्व प्रकारचे पोषक घटक मिळतात.

पोट/ आतड्यांसाठी फायदेशीर

सहसा, खिचडीमध्ये जास्त मसाल्यांचा वापर केला जात नाही, म्हणूनच खिचडीला नेहमीच निरोगी अन्न मानले गेले आहे. आयुर्वेदात खिचडी आपल्या आतड्यांसाठी आणि पोटासाठी खूप फायदेशीर असल्याचे म्हटले आहे. खिचडी योग्य पचन राखण्यास मदत करते, ज्यामुळे आपले पोट योग्य राहते आणि आपण आजारांना बळी पडत नाही.

गॅसची समस्या कमी होते

गरोदरपणात महिलांना बद्धकोष्ठता किंवा अपचन अनेकदा जाणवते. एवढेच नाही तर बाहेरचं थोडं जास्त खाल्ल्यानंतरही त्यांच्या पोटात समस्या उद्भवू शकते. जर तुम्ही अशा कोणत्याही परिस्थितीमुळे त्रस्त असाल तर खिचडी खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. खिचडी खाल्ल्यानंतर पोटात जडपणा येत नाही आणि अन्न पटकन पचते.

मूड चांगला ठेवण्यासाठी

बऱ्याचदा काम करणारे पुरुष आणि स्त्रिया कामानंतर स्वयंपाक करायला कंटाळतात आणि घाई घाईत बाहेरून काहीतरी आणून खातात. तुम्हीसुद्धा असंच काही करत असाल किंवा जेवण बनवायला तुम्हाला फारसा वेळ मिळत नसेल तर खिचडी हा सर्वात सोपा मार्ग आहे. आपण मसूर, तूर, मूग डाळ, शेंगदाणे आणि आपल्या आवडीचे इतर पदार्थ त्यात घालू शकता. 

पोषक घटक मिळतात

खिचडी खाण्याचा एक फायदा म्हणजे त्याचे सेवन केल्याने आपल्याला भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात. जर तुम्ही आठवड्यातून एकदा ते खाल्ले तर तुम्हाला पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससह अनेक पोषक तत्व मिळतात.  त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते.

संतुलित आहार

लोक संतुलित आहार घेण्यासाठी डाळी, भाज्या, चपाती आणि भात स्वतंत्रपणे बनवतात. यामध्ये त्यांचा बराचसा वेळ अशा प्रकारे घालवला जातो. पण जर तुमच्याकडे स्वयंपाकासाठी जास्त वेळ नसेल तर खिचडी बनवणे ही नक्कीच चांगली कल्पना आहे. कारण ते कार्बोहायड्रेट्स ते प्रथिने आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्सची कमतरता पूर्ण करते. हवंतर तुम्ही यात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी वापरू शकता. तांदळाऐवजी तुम्ही ओट्सची खिचडीही बनवू शकता. 

खिचडी चांगली होण्यासाठी टिप्स

१) तुम्ही कधीतरी खिचडी बनवत असाल तर बासमती तांदूळ  घ्या. तांदूळ चांगला धुवून घ्यावा. आणि किमान अर्धा तास तो पाण्यात भिजवावा. यामुळे तांदूळ नरम होतात. आणि जेव्हा ते शिजवतो तेव्हा पाणी शोषण्याची क्षमता कमी होते.

२)  तांदूळ शिजवताना तो खूप शिजणार नाही याची काळजी घ्यावी. तांदळाच्या तिप्पट चौपट पाणी घेऊन त्यात थोडं मीठ आणि तेल घालून पाण्याला उकळी आली की धुवून भिजवलेले तांदूळ घालावेत. पाच मिनिट उकळल्यानंतर तांदूळ बोटचेपा झालाय ना हे बघावं.

३) तांदूळ मोकळा शिजण्यासाठी पाण्यात थोडा लिंबाचा रस घालावा. लिंबाच्या रसामुळे तांदळाचे दाणे एकमेकांना चिटकत नाही.

४) खिचडी करताना तांदूळ धुताना घाई करु नये. तांदूळ चांगले चार पाच वेळा पाण्यानं धुवावेत. त्यामुळे तांदळातले तण निघून जातं. त्यामुळे खिचडी मोकळी होते. तसेच खिचडी करताना त्यात एक चमचा तूप  घालावं. त्यामुळे तांदूळ छान मोकळा शिजतो आणि खिचडीचा स्वादही छान येतो.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्न