रोज जेवणासाठी काय खास करायचे हा प्रश्न रोजच पडतो. त्याचे उत्तर काही मिळत नाही. भारतीय आहारात अनेक पदार्थांचा समावेश होतो. मोजताही येणार नाहीत एवढे पदार्थ असतील. प्रत्येक राज्याची खासियत वेगळी आहे. सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचा आहार घेतला जातो. (Does rice in the cooker overflow from the pot? Add a pinch of 'this' while cooking the rice, see the magic)फक्त राज्यानुसार नाही तर गावानुसार पदार्थ बदलतात. घरोघरी वेगळ्या पद्धतीने अन्न केले जाते. मात्र काही पदार्थ सगळीकडे सारखे आहेत. जे अस्सल भारतीय आहार म्हणून आपण ओळखतो. रोज भाजी जरी वेगळी केली तरी भात, पोळी ताटात असतेच. डाळ, वरण , आमटी घरोघरी केली जाते. रोज हे पदार्थ आपण तयार करतोच. त्यामुळे सगळ्यांना ते व्यवस्थित करता येतात.
भात कुकरमध्ये लावला जातो. तसेच भात पातेल्यातही करतात. कुकरमधील भात जास्त लोकप्रिय आहे. भारतात घरोघरी कुकरची शिटी रोज वाजतेच. भारतीयांच्या मते भात आणि डाळ हा अगदी मस्त आहार आहे. पण कुकरमध्ये लावलेला भात फुलून बाहेर पडतो. अनेकदा मग त्याचा लगदा होतो. एकदम चिकट होऊन जातो. मोकळा छान खमंग भात खायला जशी मज्जा येते तशी असा सांडलेला भात खाण्यात येत नाही. कुकरमध्ये भात लावताना तो जास्त फुलून सांडू नये किंवा त्याचा लगदा होऊ नये यासाठी एक अगदी साधा उपाय करायचा. भात लावताना तांदूळ आपण स्वच्छ धुतो. तांदूळ धुतल्यावर ते कुकरला लावताना त्यात पाणी बोटांएवढे ठेवायचे. म्हणजे भात अगदी छान होतो. आणि भातात अगदी चमचाभर मीठ घालायचे. मीठ घातल्यामुळे भात भांड्यातून बाहेर पडत नाही. जास्त फुलला तरी भांड्यातच राहतो. बाहेर पडत नाही.
तसेच डाळही आपण रोज खातो. डाळ अत्यंत पौष्टिक असते. त्यामुळे रोज डाळ खाणे आरोग्यासाठी नक्कीच चांगले. मूगडाळ, चणाडाळ, तुरडाळ, मसूरडाळ आदी डाळींचे प्रकार आपण खातो. त्या पौष्टिक असल्यातरी पचायला जरा जड असतात. तसेच काही वेळा वात वाढण्यास कारणीभूत ठरतात. अगदी एक चमचाभर हिंग डाळ पचायला हलकी जावी यासाठी फायद्याचे ठरते. डाळ लावताना त्यात थोडं हिंग आणि हळद घालायची. मग डाळ शिजवायची. अजिबात बाधणार नाही.