चित्रपट बाजीराव मस्तानीच्या गाण्याने प्रत्येक सिनेरसिकाच्या मनामध्ये एक विशेष स्थान निर्माण केले असून चित्रपटातील प्रत्येक गाणे सुंदर आणि देखणे आहे. चित्रपटातील प्रत्येक गाणे खूपच खास आहे. बाजीराव मस्तानीमधील ‘पिंगा’, ‘गजानना’ आणि ‘दीवानी मस्तानी’ हे गाणे उत्तम आहेच पण दीवानी मस्तानी गाण्याकरिता बनवण्यात आलेला आइना महलही तेवढाच खास होता. त्यामुळे गाण्यात एक सुंदर झळाळी निर्माण झाली. आता प्रेक्षकांसमोर ‘मल्हारी’ हे विजयगीत येत असून चित्रपटात या गाण्याचे विशेष महत्व आहे. मल्हारी विजयगीतसाठी बाजीराव मस्तानीच्या टीमला विशेष मेहनत घ्यावी लागली आहे. कारण गाण्याचे चित्रीकरण खूप मोठ्या स्तरावर करण्यात आलेय. मल्हारी या गाण्यात पेशवा बाजीराव यांचे शौर्य आणि विजयी जल्लोष दाखवण्यात आला आहे. अभिनेता रणवीर सिंगने कित्येक दिवसांच्या प्रॅक्टिसनंतर गाण्याचे चित्रण ५ दिवसांत पूर्ण केले. विशेष म्हणजे रणवीर जखमी अवस्थेत असतानाही या पठ्ठ्याने ५ दिवसांत हे गाणे पूर्ण केले. मल्हारी विजयगीताचे बोल ‘दुश्मनची वाट लावली’ हे आहेत आणि हे गीत पेशवा बाजीराव त्यांच्या शत्रूवर विजय नोंदवून जेव्हा घरी येतात तेव्हा ‘मल्हारी’ हे विजयी गाणे गाऊन विजय साजरा करण्यात येतो. मल्हारी गीतास विशाल ददलानीने आवाज दिलाय, तर गणेश आचार्यने कोरियोग्राफ करून चार चाँद लावले आहेत. इरॉस इंटरनॅशनल आणि संजय लीला भन्साली निर्मित हा चित्रपट १८ डिसेंबर रोजी सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.
बाजीराव मस्तानी चित्रपटात ‘मल्हारी’चा विजय घोष
By admin | Updated: November 28, 2015 01:21 IST