Join us  

'ये है मोहब्बतें’ने पूर्ण केला 5 वर्षांचा टप्पा !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 1:14 PM

दिव्यांका त्रिपाठी, करण पटेल, अदिती भाटिया, सुधा चंद्रन, कृष्णा मुखर्जी, नीना कुलकर्णी, शिरीन मिर्झा आणि अन्य कलाकारांचा समावेश होता.

स्टारप्लस साजरी करत आहेत सर्वात लोकप्रिय शो 'ये है मोहब्बतें'ची 5 यशस्वी वर्षे. डिसेंबर 2013 मध्ये प्रसारित झालेल्या शोने जगभरातील लाखो दर्शकांना आकर्षित केले. रमन आणि इशिता यांनी आतापर्यंत प्रत्येक संकटात एकमेकांची साथ दिली आहे.  यात दिव्यांका त्रिपाठी, करण पटेल, अदिती भाटिया, सुधा चंद्रन, कृष्णा मुखर्जी, नीना कुलकर्णी, शिरीन मिर्झा आणि अन्य कलाकारांचा समावेश होता.

दिव्यंका त्रिपाठी म्हणाली, ''ये है मोहब्बतें यशस्वी 5 वर्षे साजरी करत आहे आणि मी ह्यापेक्षा अधिक आनंदी होऊ शकत नाही. या शोच्या दरम्यान बरेच काही झाले आहे आणि आम्ही कलाकार म्हणून प्रगल्भ झालो आहोत. संपूर्ण कलाकार आणि क्रू आता माझ्यासारख्या कुटुंबासारखे आहेत. 5 वर्षे आणि अजूनही हा प्रवास सुरु आहे. एकताचा दृष्टिकोन, संदीपची रचना इतकी सुंदरपणे आणि आमच्या लेखक - सोनाली, रितु आणि टीमने बनवली. त्यांच्या कथानकातील नाट्यमय वळणे आजही आम्हाला आश्चर्यचकित करतात.” 5 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल करन पटेल खुश होता आणि म्हणाला, ''मागील 5 वर्षांपासून प्रेक्षकांनी आम्हाला बिनशर्त प्रेम आणि पाठिंबा दिला त्यामुळे आम्ही आज इथे आहोत. घडी की सुईया बदल जायें, पर आपकी मोहब्बत कम नही होती.''

बऱ्याच समांतर कथा आणि प्रत्येकच व्यक्तिरेखेच्या आयुष्यात घडत असलेल्या नाट्‌यमय घडामोडींमुळे प्रेक्षकांना पुढील भागांमध्येही आपल्या आवडत्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात वळणे येताना दिसणार आहेत.

टॅग्स :ये है मोहब्बतेंदिव्यांका त्रिपाठी