Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिल से दिल तक या मालिकेत हा अभिनेता घेणार सिद्धार्थ शुक्लाची जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 12:44 IST

सिद्धार्थ शुक्ला दिल से दिल तक या मालिकेत पार्थ भानुशाली ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेच्या सेटवर काही दिवसांपूर्वी ...

सिद्धार्थ शुक्ला दिल से दिल तक या मालिकेत पार्थ भानुशाली ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या मालिकेच्या सेटवर काही दिवसांपूर्वी खूप मोठा तमाशा झाला. या मालिकेत अमनची भूमिका साकारणारा कुणाल वर्मा याच्यासोबत गैरवर्तन केल्याबद्दल सिद्धार्थला निर्मात्यांनी ही मालिका सोडायला सांगितली होती. सिद्धार्थ कुणालसोबत खूपच वाईट वागत होता. तसेच त्यावर अनेक कमेंट पास करत होता. त्यामुळे शेवटी कंटाळून कुणालने याबाबत निर्मात्यांना तक्रार केली होती. निर्मात्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी सिद्धार्थला त्याच्या वागणुकीसाठी माफी मागायला सांगितली होती. पण कुणालची माफी मागायला सिद्धार्थ तयारच नव्हता. या उलट अनेक निर्माते त्याच्यासोबत काम करण्यास उतावीळ असल्याचे त्याने निर्मात्यांना म्हटले होते. सिद्धार्थने प्रोडक्शन टीमसोबत देखील या प्रकरणावरून भांडणे केल्यानंतर त्यांनी सिद्धार्थची तक्रार कलर्स वाहिनीकडे केली होती. सिद्धार्थ मालिकेत असल्यास कोणताही कलाकार अथवा टीममधील सदस्य चित्रीकरण करणार नसल्याचे मालिकेच्या टीमने वाहिनीला सांगितले होते. हे प्रकरण शांत झाल्यानंतर सिद्धार्थने पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली होती. पण सिद्धार्थचे या मालिकेतील नायिका रश्मी देसाईसोबत देखील पटत नव्हते. सिद्धार्थ मालिकेचे चित्रीकरण कोणत्या ना कोणत्या कारणांनी अनेकवेळा थांबवून ठेवत असे. रश्मी देसाईची व्हॅनिटी सिद्धार्थपेक्षा मोठी असल्याने सिद्धार्थने यावर प्रोडक्शन टीमला तक्रार केली होती आणि जोपर्यंत तिच्यापेक्षा मोठी व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करणार नाहीत, तोपर्यंत चित्रीकरण करायचे नाही असे देखील ठरवले होते. रश्मीसोबत देखील त्याचा अनेक वेळा वाद झाला आहे. सिद्धार्थ कोणाचेही ऐकत नसल्याने, सगळ्यांशी उद्धट पद्धतीने वागत असल्याने त्याला या मालिकेतून काढण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.दिल से दिल तक या मालिकेत सिद्धार्थची जागा आता रोहन गंडोत्रा घेणार असल्याची चर्चा आहे रोहनने या आधी काला टीका या मालिकेत काम केले आहे. रोहनला देखील चांगलीच फॅन फॉलॉव्हिंग असल्याने तो या मालिकेसाठी योग्य असल्याने या मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे.सिद्धार्थ बालिका वधू या मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे नावारूपाला आला.  Also Read : ​जास्मिन भसीनला या कलाकाराची वाटायची भीती?