अंताक्षरी म्हटले की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. १९९३ मध्ये सुरु झालेल्या या कार्यक्रमाने प्रत्येक कुटुंबाला एकत्रच आणलं. प्रत्येक रविवारी अंताक्षरी बघण्यासाठी घरामध्ये लगबग पाहायला मिळायची. तसेच हा सहकुटूंब कार्यक्रम बघण्याची मजा ही काही औरच होती. या म्युझिकल रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन अन्नु कपूर यांनी केले. यांच्यासोबत त्यावेळी सहसूत्रसंचालन रेणुका शहाणे, राजेश्वरी सचदेव, दुर्गा जसराज आणि पल्लवी जोशी यांनी केले होते. आता याच चार अभिनेत्रींनी एका कार्यक्रमदरम्यान एकत्रित येऊन या अंताक्षरीच्या या जुन्या आठवणीं पुन्हा जाग्या केल्या आहेत.
जुन्या आठवणींना उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2016 17:15 IST