'तारक मेहता का उलटा चष्मा' या लोकप्रिय हिंदी मालिकेने नुकतच दोन हजार एपिसोडचा टप्पा पार केलाय. त्यामुळेच आजही या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे. अय्यर, सोढी, मेहता, भिडे, जेठालाल गडा ही कुटुंब प्रेक्षकांना आपल्यातलीच एक वाटतात. प्रेक्षकांना खळखळून हसवताना या मालिकेने नेहमीच आपले सामाजिक भानही जपलय. देशातील 'तारक मेहता का उलट चष्मा' सर्वाधिक काळ चाललेली विनोदी मालिका नसून, सर्वाधिक एपिसोड पूर्ण करणारी मालिका आहे.
'तारक मेहताने' ओलांडला २ हजार एपिसोडचा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 12:46 IST