अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शेवटची ती आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत काम करताना दिसली. या मालिकेत तिने अरुंधतीची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतर ती शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात तिची सहकलाकार रुपाली भोसले सोबत दिसली होती. दरम्यान आता तिने एका मुलाखतीत लग्नावर भाष्य केले आहे. लग्न हे शेवटी पॉलिटिक्स असल्याचं म्हटलं आहे.
मधुराणी प्रभुलकरने आरपार ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल म्हणाली की, पितृसत्ताक समाज रचनेचे ते ही एक काय म्हणतात त्याला बळीच आहेत पण स्त्रीला ना बिचारीला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावे लागते. स्वतःच्या आवाजासाठी झगडावे लागते. माझे इतकेच म्हणणे आहे आणि त्याचा कृपया आदर ठेवा. या बेसिक गोष्टींसाठी झगडायला लागतं. एक गंमत अशी आहे या डायनॅमिक्समध्ये हे काय लग्न हे शेवटी पॉलिटिक्स आहे. पॉवर गेम आहे आणि तो पॉवर गेम जोपर्यंत छान चाललाय तोपर्यंत सगळं छान आहे. पण तिथले डायनामिक्स चेंज झाले की मग गडबड आहे.
''पण आता परिस्थिती बदलतेय आणि..''ती पुढे म्हणाली की, आता काही पुरुष जे स्वतःला पुढारलेले म्हणवतात ते असे म्हणतात की बघ मी तुला सपोर्ट केला मी तुला जायला दिलं नोकरीला. मी तुला परवानगी दिली. एक मिनिट कोण आहेस तू? बरं हे सगळं एका पिढीने स्वीकारले रे. माझा नवरा ना खूप सपोर्टिव्ह आहे. तो ना मला नाही म्हणत नाही. एक मिनिट... तो नाही म्हणणारा कोण आहे? तुम्ही एकत्र येऊन निर्णय घ्यायचाय आणि तुझा सपोर्ट हा त्यांनी वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या गृहित धरला आहे. म्हणून ती करतीयेस. हे तुलाही तुझ्याही गावी नाहीये आणि त्याच्याही गावी नाहीये, त्यांना बिचाऱ्यांना वाटत असतं आपण फार भारी. कारण त्यांना तेवढंच माहीत असतं. पण आता परिस्थिती बदलतेय आणि ती बदलायला हवी.