Join us  

ढालेपाटील कुटुंबातील कोणी केला अपर्णाचा खून?; संजू देईल का सत्याची साथ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 8:07 PM

Raja ranichi g jodi: दिवसेंदिवस या मालिकेत नवनवीन घटना घडतांना पाहायला मिळत आहेत. यामध्येच अपर्णाचा खून झाला असून संजू तिच्या मारेकऱ्याचा शोध घेत आहे. 

ठळक मुद्देअपर्णाच्या ब्लॅकमेलिंगला ढालेपाटील कुटुंबातील प्रत्येक जण कंटाळला होता.

कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारी मालिका म्हणजे 'राजा रानीची गं जोडी'. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे ही मालिका सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. मधल्या काळात ढालेपाटील कुटुंबात अनेक चढउतार आले. मात्र, या सगळ्या संकटांना संजू आणि रणजीत खंबीरपणे सामोरे गेले. विशेष म्हणजे दिवसेंदिवस या मालिकेत नवनवीन घटना घडतांना पाहायला मिळत आहेत. यामध्येच अपर्णाचा खून झाला असून संजू तिच्या मारेकऱ्याचा शोध घेत आहे. 

अपर्णाच्या ब्लॅकमेलिंगला ढालेपाटील कुटुंबातील प्रत्येक जण कंटाळला होता. त्यामुळे तिचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कुसुमावती ढाले-पाटील प्रयत्न करत होते. तर दुसरीकडे दादासाहेब सूरजला अडकव्यासाठी अपर्णाला मारायचा प्लॅन आखत होते. इतकंच नाही तर अपर्णाला कंटाळून सूरजनेदेखील त्याचा मार्ग मोकळा करायचं ठरवलं होतं. यामध्येच अपर्णा आणि कुसुमावतींची भेट झाल्यानंतर अपर्णाचा खून झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, हा खून नेमका कोणी केला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे अपर्णाचा खून नेमका कोणी केला हे स्पष्ट झालेलं नाही. परंतु, या सगळ्या प्रकरणात संजू कोणाची साथ देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये संजीवनी ठामपणे तिचं मत रणजीत पुढे मांडताना दिसते आहे.

Mumbai Cruise Drugs Case : आर्यनसह ताब्यात घेण्यात आलेली मुनमुन धमेचा नेमकी आहे तरी कोण?

“अर्जुनालादेखील त्याच्या घरच्यांविरुध्द उभं राहावं लागलंच होतं. मी घरच्यांच्या नाही सत्याच्या बाजूने उभं रहाणार”,असे म्हणताना ती दिसली. या खुनाच्या शोधात संजीवनीला रणजीतची साथ प्रत्येक वळणावर मिळणार हे निश्चित ! 

'गलगले निघाले'मधील भरत जाधवची प्रेयसी आठवते का? आता झालाय कमालीचा बदल

या मालिकेत सध्या पोलिस अपर्णाच्या मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे ढालेपाटील कुटुंबातील आईसाहेब, दादासाहेब आणि सूरज या तिघांकडे संशयाची सुई जात आहे. मात्र, त्यांच्यापैकी नेमका खरा मारेकरी कोण हे उलगडलं नाही. परंतु, यांच्यापैकी कोणीही मारेकरी निघालं तरीदेखील संजू सत्याची साथ देणार हे निश्चित झालं आहे. मात्र, मालिकेत पुढे काय उघडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार