Join us

बालिकावधूचे चित्रीकरण संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 10:22 IST

अनेक वर्षांपासून बालिकावधू ही मालिका सुरू आहे. या मालिकेला सुरुवातीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. पण कालांतराने या मालिकेचा टीआरपी ...

अनेक वर्षांपासून बालिकावधू ही मालिका सुरू आहे. या मालिकेला सुरुवातीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. पण कालांतराने या मालिकेचा टीआरपी कमी होत गेला. गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेची लोकप्रियता खूपच कमी झाली होती. त्यामुळे वाहिनीकडून ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या मालिकेच्या टीमने नुकतेच त्यांच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण केले. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या माही वीजने या मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण नुकतेच झाले असे फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहे. त्याचसोबत शेवटच्या भागातील तिचा फोटोही पोस्ट केलेला आहे.