सध्या महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना (Corona Virus) रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. मात्र तरीही कोरोना निर्बंधांमुळे अनेक व्यवसायांवर विपरीत परिणाम होतो. पन्नास टक्के चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु ठेवण्याची परवानगी आहे, त्यामुळे या क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबतची नाराजी नुकतीच चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) फेम सागर कारंडे (Sagar Karande) याने 'लोकमत'कडे व्यक्त केली.
सागर कारंडे 'लोकमत'शी बोलताना म्हणाला की, कोरोनामुळे नाट्यगृहात फक्त पन्नास टक्केच प्रेक्षकांच्या उपस्थितींचे बंधन आहे, त्याबद्दल थोडीशी माझी नाराजी आहे. कारण इतर ठिकाणी कुठेच पन्नास टक्के लोकांना परवानगी नाही आहे. मग ते रेस्टॉरंट असतील किंवा बस वा ट्रेन. मग फक्त नाट्यगृहांमध्येच का पन्नास टक्के लोकांना परवानगी आहे. नियमांचे बंधन फक्त नाट्यगृहांनाच का, रात्रीचा प्रयोग ८ वाजता असतो आणि तो १० किंवा १०.३०-११ ला संपतो. बाकीच्या गोष्टी रात्री १० नंतरही सुरू असतात. मग हे सर्व नियम नाट्यगृहांनाच का, असा सवालही यावेळी त्याने उपस्थित केला.