अंकित मोहन नागिन ३ या मालिकेद्वारे करणार कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 12:24 IST
एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमापासून अंकित मोहनने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मिले जब हम तुम, घर आजा परदेसी, महाभारत, कुमकुम ...
अंकित मोहन नागिन ३ या मालिकेद्वारे करणार कमबॅक
एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमापासून अंकित मोहनने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मिले जब हम तुम, घर आजा परदेसी, महाभारत, कुमकुम भाग्य यांसारख्या मालिकांमधल्या त्याच्या भूमिका गाजल्या. आता तो एकता कपूरच्या प्रसिद्ध नागिन ३ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत या मालिकेत सुरभी ज्योती, पर्ल व्ही पुरी, पवित्रा पुनिया, अनिता हंसनंदानी, रक्षंदा खान यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. तसेच करिश्मा तन्ना देखील या मालिकेत काम करणार असल्याची चर्चा आहे. अंकितची या मालिकेत काय भूमिका असणार आहे याबाबत अंकितने मौन राखणेच पसंत केले आहे. पण अंकितने याआधी देखील बालाजी टेलिफ्लिम्स सोबत काम केले होते. त्याने एकताच्या कुमकुम भाग्य या मालिकेत एक प्रमुख भूमिका साकारली होती. त्यामुळे एकताच्या या मालिकेत देखील तो महत्त्वाच्याच भूमिकेत झळकणार असल्याची जोरदार चर्चा आहे.अंकित मोहनने कुमकुम भाग्य या मालिकेला काही महिन्यांपूर्वी रामराम ठोकला होता. या मालिकेला खूप चांगला टिआरपी आहे आणि त्यात अंकित साकारत असलेली भूमिका महत्त्वाची होती. तरीही त्याने इतकी चांगली मालिका का सोडली हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. पण तो दरम्यानच्या काळात त्याच्या एका नव्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र असल्याने त्याने ही मालिका सोडली होती. अंकित लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अंकित एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. कोणत्याही चित्रपटात काम करण्याची अंकितची ही पहिलीच वेळ आहे. अंकितने त्याच्या या नवीन चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटात तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे कळतेय. विशेष म्हणजे अंकित हा अमराठी असल्याने त्याला मराठी बोलता येत नाही. पण त्याने या भूमिकेसाठी मराठीचे धडेदेखील गिरवले आहेत. अंकितने अभिनेत्री रुची सवर्णसोबत लग्न केले आहे. रुचीला अस्खलित मराठी बोलता येते. तिने सखी या मराठी मालिकेत काम केले होते. तिनेच अंकितला मराठी शिकण्यासाठी मदत केली आहे.Also Read : कुमकुम भाग्य या मालिकेतील रुची सवर्णला काय झाले?