बिग बॉसच्या (bigg boss marathi) घरात एकत्र वावरणारे स्पर्धक टास्कच्या दरम्यान अनेकदा स्वतंत्र खेळताना दिसतात. या पर्वात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला हे पर्व जिंकायचं आहे. त्यामुळे घरात जरी ते एकमेकांचे चांगले मित्र वाटत असले तरीदेखील प्रत्यक्षात प्रत्येक जण आपआपला खेळत आहे. म्हणूनच, घरातल्या कोणत्या स्पर्धकाचा नेमका कोणाला पाठिंबा आहे हे समजणं तसं कठीणच. यामध्येच आता एकमेकांमध्ये चांगली मैत्री असलेल्या उत्कर्ष आणि मीरामध्ये फूट पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये किरकोळ वाद होत असतानाच आता मीराने उत्कर्षचा पाठिंबा काढून घेतला आहे.
'मीरा आणि उत्कर्ष एका टास्कविषयी बोलत असताना यापुढे माझा तुला पाठिंबा नसेल", असं मीराने स्पष्टपणे उत्कर्षला सांगितलं आहे. इतकंच नाही तर तिच्या या वक्तव्यामुळे उत्कर्षलादेखील तिचा राग आल्याचं दिसून येत आहे.
"जे काही झालं,आपण सगळे वेगळे झालो ठीक आहे. जय आणि स्नेहा एकमेकांसाठी असणार आहेत पुढे... तुझ्याबरोबर कोण आहे?", असा प्रश्न मीराने उत्कर्षला विचारला. त्यावर, उत्कर्षने "तू आहेस ना" असं म्हटलं. परंतु, त्याचं हे वाक्य ऐकल्यावर तिने थेट नकार दिला.
"नाही... मी आणि गायत्री आम्ही दोघी तुला सपोर्ट करायचो. मग आता असं वागल्यावर नाही करणार तुला सगळ्यांसमोर सपोर्ट. मी माझा खेळ खेळते", असं मीरा म्हणाली. दरम्यान, यावेळी मीरा व उत्कर्ष यांनी गायत्रीविषयीदेखील चर्चा केली. जर गायत्रीचं वागणं बदललं नाही. तर मी पुढच्यावेळी तिचंही नाव घेईन. मी फेअर गेम खेळणार असं मीरा म्हणाली. त्यामुळे आता या पुढच्या भागात काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.