सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ मालिकेचे प्रेक्षक दिव्य राम कथेत आता एक मोठे वळण आलेले बघत आहेत. हनुमान लंकेहून परत येताना सीतेने दिलेला चुडामणी आपल्या सोबत घेऊन आला आहे. या चुडामणीसह हनुमान सीता मातेचा संदेश श्रीरामाला देतो, रामाला लंकेच्या परिस्थितीची माहिती देतो. ते ऐकून श्रीराम सीतेला लंकेतून सुखरूप परत आणण्यासाठी सज्ज होतात आणि सुग्रीवाला सैन्य तयार करण्याचे आदेश देतात. लंकेच्या दिशेने जात असताना समुद्राच्या रूपाने एक मोठा अडथळा त्यांच्या मार्गात येतो. समुद्र पार करून जाण्याचा कोणताच मार्ग त्यांना दिसत नाही. विचलित न होता श्रीराम सागराची देवता- वरुण देवाची प्रार्थना करतात. श्रीरामाने मनःपूर्वक केलेल्या प्रार्थनेला देखील जेव्हा वरुण देव दाद देत नाही, तेव्हा श्रीरामाचे धैर्य सुटते आणि ते आपले धनुष्य उचलतात. श्रीरामाचा तो अढळ निर्धार पाहून वरुण देव प्रकट होतो आणि रामाला समुद्र पार करण्यासाठीचा उपाय सांगतो. रामायण या महाकाव्यातील ही एक लक्षणीय घटना आहे.
‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील राम कथेत मोठं वळण, पाहायला मिळणार राम सेतू प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 18:52 IST
Shrimad Ramayana :‘श्रीमद् रामायण’ मालिकेचे प्रेक्षक दिव्य राम कथेत आता एक मोठे वळण आलेले बघत आहेत. हनुमान लंकेहून परत येताना सीतेने दिलेला चुडामणी आपल्या सोबत घेऊन आला आहे.
‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील राम कथेत मोठं वळण, पाहायला मिळणार राम सेतू प्रसंग
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}