Join us

'उडान' मालिका घेणार 5 वर्षाचा लिप,अशी बदलणार कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 13:15 IST

'चकोर'ची प्रेमळ प्रमुख भूमिका मीरा देवस्थळे करत असलेल्या  सामाजिक घटनांवर आधारित असलेल्या 'उडान' या शोने त्याच्या रंजक आणि समाजाशी ...

'चकोर'ची प्रेमळ प्रमुख भूमिका मीरा देवस्थळे करत असलेल्या  सामाजिक घटनांवर आधारित असलेल्या 'उडान' या शोने त्याच्या रंजक आणि समाजाशी संबंधित असलेल्या कथेने रसिकांची  मनं जिंकली आहेत. दुष्टावर सुष्टाच्या विजयाची ही कथा असून, अखेरीस चकोर विरोधक कमल नारायणला ठार मारते. तथापि, योग्य दिशेने चाललेला हा प्रवास इतका सोपा नाही. चकोरला तुरूंगात टाकले जाते आणि हा शो पुढे झेप घेताना दिसणार आहे. तुरूंगातून सुटल्यानंतर, 5 वर्षे तुरूंगात काढल्यानंतर ती आझादगंजला परत येते, या आशेने की गावात शांतता आणि स्थिरस्थावर झालेले पहायला मिळेल.ती जेव्हा तेथे पोहोचते तेव्हा गोष्टी अजूनच वाईट झालेल्या आहेत हे पाहून तिला धक्का बसतो. झेप घेण्या विषयी बोलताना, चकोरची भूमिका करणा-या,मीरा देवस्थळे म्हणाली,“प्रत्येक गोष्ट बदलली आहे. तुरूंगात 5 वर्षे काढल्यानंतर जेव्हा चकोर परत येते तेव्हा तिची स्वप्ने भंग झालेली असतात. गावक-यांवर जास्त अत्याचार होताना तिला दिसून येतो आणि तिचा प्रियकर सूरजच्या समोर ती येते, तेव्हा तो पूर्णपणे बदललेला तिला दिसतो.या सर्व बदलांमुळे हा नवीन शो असल्यासारखे वाटत आहे.“'उडान' मध्ये सूरजची भूमिका साकारणारा विजयेंद्र कुमेरिया, म्हणाला की, “कधीकाळी गावक-यांचा मित्र आणि विश्वासू असणारा सूरज आता पूर्णपणे बदललेला आहे. एकेकाळी 'चकोर'चे जग असणारा हा माणूस तिला सुद्धा ओळखण्याचे नाकारतो.“चकोरचा हा नवीन प्रवास नव्या आव्हानांनीभरलेला आहे नक्कीच.आझादगंजमध्ये पुन्हा शांतता ती आणू शकेल का? एकेकाळी ज्याच्यावर विश्वास ठेवत होती त्या सूरजशी ती भावनिक लढा देऊ शकेल का? हे पाहणे रसिकांसाठी रंजक असणार आहे.मालिकेतील 'चकोर' आणि 'सूरज'ची केमिस्ट्री रसिकांच्या चांगल्याच पसंतीस पात्र ठरली होती,चकोर आणि सूरजच्या सुरुवातीला हे दोघे सेटवर एकमेंकाशी फारच क्वचित बोलायचे.त्यामुळे असा अंदाज बांधला जायचा की पडद्यावर यांच्या जोडीला रसिक पसंत करणार नाहीत. मात्र हळूहळू चकोर आणि सूरजमधली मैत्रीचे नाते फुलत गेले.कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्याच्या मागेसुद्धा हे एकमेंकाचे चांगले मित्र झाले आहेत.चकोरची भूमिका साकारत असलेल्या मीराचा विश्वास आहे की सूरजकडे अर्थात विजेंद्रकडे अभिनयाच्या तांत्रिक कौशल्याची चांगली जाण आहे.मीरा सांगते, तो नेहमीच मला माझा सीन्स आणखीन चांगला कसा होईल याबाबतचा सल्ला देतो आणि जेव्हा त्यांने दिलेल्या सूचनेचा नेहमीच मला अभिनयात फायदा झाला आहे.तो माझा अतिशय जवळचा मित्र झाला आहे.आमच्या मालिकेची यशाकडे होणारी घौडदौड पाहुन मला खूप कौतुक वाटत आहे.