Join us

‘या’ सत्य घटनांचा चंदेरी दुनियेनेही घेतला शोध!

By admin | Updated: March 17, 2017 04:56 IST

चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा. समाजात घडणाऱ्या घटना, घडामोडी, गुन्हे, सकारात्मक बदल हे सर्व चित्रपटांच्या माध्यमातून रंजक पद्धतीने दाखविले जाते.

चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा. समाजात घडणाऱ्या घटना, घडामोडी, गुन्हे, सकारात्मक बदल हे सर्व चित्रपटांच्या माध्यमातून रंजक पद्धतीने दाखविले जाते. चित्रपटसृष्टीला या विविध प्रकारांमुळे अनेक पैलू पडले. यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे गुन्हेगारी जगत. पूर्वीपासून गुन्हे हे घडतच आलेत. त्या गुन्ह्यांना आपण रुपेरी पडद्यावर उत्सुकतेने पाहतो. फरक फक्त एवढाच, की पूर्वीच्या काळी अत्यंत साध्या पद्धतीने गुन्हे घडत असायचे. काळानुरूप बदल होत गेले आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध गुन्ह्यांना आधुनिक रूप प्राप्त झाले. किचकट गुन्हे, प्रकार, शोधमोहीम, तर्कवितर्क या सर्वांमुळेच गुन्हे जगतातील चित्रपटांना विशेष प्राधान्य मिळाले. बॉक्स आॅफिसवर जास्त गल्ला जमविण्यासाठी मग दिग्दर्शकांनी चित्रपटांच्या माध्यमातून गुन्हे जगत पडद्यावर आणण्याची शक्कल लढवली. त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळाले. मग काय, गुन्हे जगतातील सत्य घटनांवर आधारित चित्रपटांचा सपाटाच सुरू झाला. पाहू या, कोणते आहेत हे चित्रपट ज्यांच्यामुळे या सत्य घटना प्रेक्षकांसमोर आल्या....तलवार दिग्दर्शक मधुर भांडारकर हे आशयघन, गंभीर विषय घेऊन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ‘हिरोइन’, ‘फॅ शन’, ‘पेज ३’, ‘आन’, ‘कॅलेंडर गर्ल्स’, ‘जाल’ यासारख्या चित्रपटांतून संबंधित समाजाचे गंभीर विषय, प्रश्न त्यांनी मांडले. त्यांनी ‘आरुषी तलवार’ हिच्या गूढ मृत्यूसंदर्भातील ‘तलवार’ हा चित्रपट प्रदर्शित केला. चित्रपटाच्या माध्यमातून ही केस सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात इरफान खान, कोंकणा सेन यांनी अभिनय केला.वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई ७०च्या दशकात अंडरवर्ल्ड जगतात कशा घडामोडी, हालचाली झाल्या, हे जाणून घ्यायला नक्कीच प्रेक्षकांना आवडते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि हाजी मस्तान यांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वसामान्यांना असतेच. अंडरवर्ल्ड जगतातील घडामोडींवर आधारित ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. त्यात अजय देवगण, कंगना राणौत, इम्रान हाश्मी, प्राची देसाई यांनी दमदार भूमिका साकारल्या. ब्लॅक फ्रायडे संघर्षात्मक चित्रपट बनविणारा दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप. १९९३च्या ‘मुंबई बॉम्ब ब्लास्ट’ या सत्य घटनेवर आधारित ‘ब्लॅक फ्रायडे’ या चित्रपटाला २००४मध्ये प्रदर्शित करण्याचा मानस होता. मात्र, चित्रपटाचे कथानक लक्षात घेता २००७मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करावा लागला. नो वन किल्ड जेसिका दिल्लीची मॉडेल जेसिका लाल हिच्या खून प्रकरणावर आधारित ‘नो वन किल्ड जेसिका’ चित्रपटाने एकच खळबळ उडवून दिली होती. अभिनेत्री राणी मुखर्जी हिची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून जेसिकाची कथा जगाला कळाली. चित्रपटात विद्या बालन आणि राणी मुखर्जी यांनी दमदार भूमिका साकारून चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेले.मद्रास कॅफे १९८०चे श्रीलंकन सिव्हिल वॉर, भारतीय पंतप्रधान राजीव गांधींची हत्या या सत्य घटनांवर आधारित ‘मद्रास कॅफे’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नसला, तरी समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळविण्यात नक्कीच यशस्वी ठरला. यात जॉन अब्राहमने उल्लेखनीय अभिनय केला.

हे राममहात्मा गांधी यांची नथुराम गोडसे याने हत्या केल्याची घटनाही प्रेक्षकांना पडद्यावर बघता आली. अभिनेता कमल हसन यांनी ‘हे राम’ या चित्रपटातून या घटनेला अतिशय खुबीने पडद्यावर रंगविले. या चित्रपटाला समाजातून तीव्र विरोध झाला; मात्र ही घटना लोकांपर्यंत पोहोचविण्यात निर्माते यशस्वी झाले, असेच म्हणावे लागेल. स्पेशल २६धाड, दरोडा, अपहरण हे तर चित्रपटांच्या बाबतीत अत्यंत आवडीचे विषय आणि त्यात अक्षयकुमार मुख्य अभिनेता म्हटल्यावर काय बोलायचे, नाही का? ‘स्पेशल २६’ या चित्रपटात अक्षयसह अनुपम खेर आणि त्यांच्या काही व्यक्तींचा ग्रुप सीबीआय आॅफिर्स म्हणून मुंबईच्या एका मोठ्या दागिन्यांच्या दालनावर धाड टाकतात. सर्व दागिने चोरून नेतात. अशा या चित्रपटाची कथा मुंबईत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.