Join us  

'घटस्फोटानंतर अनेक मित्र गमावले', संजीदा शेखचा खुलासा; पहिल्यांदाच वैयक्तिक आयुष्यावर केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 11:49 AM

संजीदा आणि आमिर टीव्हीवरील लोकप्रिय कपल होतं.

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांच्या अनेक लाडक्या जोड्या आज वेगळ्या झाल्या आहेत. ऋत्विक धनजानी-आशा नेगी, आमिर अली-संजीदा शेख, राकेश बापट- रिद्धी डोगरा यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना धक्काच बसला होता. आमिर अली (Amir Ali) आणि संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) यांनी 2022 मध्ये घटस्फोट घेतला. त्यांनी एक मुलगीही दत्तक घेतली होती. पण त्यांच्यात काय बिनसलं ज्यामुळे त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला हे अद्याप समोर आलेलं नव्हतं. आता संजीदाने नुकतंच एका मुलाखतीत याचा खुलासा केला.

Galatta India ला दिलेल्या मुलाखतीत संजीदा म्हणाली, "घटस्फोटानंतर आयुष्यात खूप बदल झाले. असे काही लोक आहेत जे आता माझे मित्र राहिलेले नाहीत. त्या लोकांचे मी उलट आभारच मानेन की ते आता माझ्या आयुष्यात नाहीत कारण त्यांच्याशिवाय मी आणखी स्ट्राँग झाली आहे. मी आता खूप खूश आहे. आयुष्यात येणारे अनुभव तुम्हाला शिकवून जातात. तुम्हाला जास्त लोकांची गरज नाही. त्यांनी जे केलं ते चांगलंच केलं."

संजीदाने तिचं वैयक्तिक आयुष्य कायमच सीक्रेट ठेवलं. घटस्फोटानंतर तिच्याविषयी ज्या चर्चा झाल्या यावर संजीदा म्हणाली, "अनेकदा मला असं वाटलंय की लोक माझ्याविषयी इतक्या का चर्चा करत आहेत. मी नशिबवान आहे की काही चांगले लोकही माझ्या आजूबाजूला आहेत. खूप मित्र बनवायचा आणि सोशल व्हायचा मला कंटाळा आलाय."

आमिर अली आणि संजीदा शेख यांनी २०१२ मध्ये लग्न केले होते. त्याआधी ते बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. 'नच बलिये 3' चे ते विजेतेही झाले. मात्र लग्नानंतर 9 वर्षांनी 2022 मध्ये त्यांचा संसार मोडला. 

संजीदा शेख नुकतीच हृृतिक रोशनच्या 'फायटर' सिनेमात झळकली. आता ती संजय लीला भन्साळींच्या आगामी 'हीरामंडी' सिनेमात दिसणार आहे. तर आमिर अलीही वेबसीरिजमधून नशिब आजमावत आहे.

टॅग्स :संजीदा शेखआमिर अलीटिव्ही कलाकारघटस्फोट