२७व्या वर्षी विधवा होण्याचं दु:ख, पतीच्या निधनानंतर ९ वर्षांनी मराठमोळ्या अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:57 IST
1 / 7शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' सिनेमात झळकलेल्या अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. याच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे विद्या माळवदे. 2 / 7विद्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र ती पर्सनल लाइफमुळे अधिक चर्चेत होती. इंडस्ट्रीत येण्याआधी विद्या एक एअर होस्टेस होती. 3 / 7तिने २४व्या वर्षी पायलट असलेल्या अरविंद सिंह बग्गा यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर ३ वर्षांतच एका विमान अपघातात तिच्या पतीचं निधन झालं. 4 / 7अवघ्या २७व्या वर्षी विद्याच्या नशिबी विधवा होण्याचं दु:ख आलं. पतीच्या निधनानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. 5 / 7पतीच्या निधनानंतर विद्याने एअर होस्टेसची नोकरी सोडली आणि ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली. २००९मध्ये विद्याने संजय दयामा यांच्याशी लग्न केलं. 6 / 7 मात्र, ती आई होऊ शकली नाही. विद्या ही दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची भाची आहे. 7 / 7विद्याने 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा','किडनॅप','बेनाम','नो प्रॉब्लेम' या सिनेमांमध्ये काम केलं. शिवाय ती 'मिसमॅच्ड' या वेबसीरिजमध्येही दिसली. काही रिअॅलिटी शोजमध्येही तिने भाग घेतला.