Join us  

'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप?; भारत गणेशपुरेंनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 3:01 PM

Bharat ganeshpure: अलिकडेच या शोमधून निलेश साबळे, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांना काढता पाय घेतला आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाविषयी सध्या अनेक चर्चा रंगत आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा आणि सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे याने काढता पाय घेतला आहे. तसंच अभिनेत्री श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके या दोघांचीही हिंदी रिअॅलिटी शोमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार की काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. यामध्येच आता विनोदवीर आणि अभिनेता भारत गणेशपुरे यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.

भारत गणेशपुरे यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये चला हवा येऊ द्याविषयी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी या मुलाखतीमध्ये हा शो बंद होणार की नाही याविषयी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले भारत गणेशपुरे?

"सध्या तरी आम्ही सोशल मीडियावर या कार्यक्रमाविषयीच्या चर्चा ऐकत आहोत. पण, चॅनेलकडून आम्हाला अद्याप तरी असा कोणताही मेसेज आलेला नाही. चला हवा येऊ द्याचं मार्च महिन्यातील शुटिंगचं शेड्युल लागलेलं आहे. हे शेड्युल आम्हाला कळवण्यातही आलं आहे. त्यामुळे तसं या महिन्यात शुटिंग होईल. मात्र, हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं अधिकृतरित्या तरी आम्हाला काही कळवण्यात आलेलं नाही," असं भारत गणेशपुरे म्हणाले. 

टॅग्स :टेलिव्हिजनचला हवा येऊ द्याभारत गणेशपुरेटिव्ही कलाकारसेलिब्रिटी