१२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेला एअर इंडिया विमान अपघात भीषण होता. २४२ प्रवासी, पायट, क्रू मेंबर सर्वांचंच या अपघातात निधन झालं. फक्त एक प्रवासी वाचला. ही घटना संपूर्ण देशाला हादरवणारी होती. हे विमान अहमदाबाद वरुन लंडनला जात होतं. कोणी फिरायला, कोणी आपल्या कुटुंबाला भेटायला तर कोणी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जात होते. सगळंच अधुरं राहिलं. मराठी अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांची लेकही वैमानिक आहे. या अपघातावर आता त्यांची प्रतिक्रिया आली आहे.
इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत अलका कुबल म्हणाल्या, "अहमदाबाद विमान अपघाताची बातमी ऐकली आणि अस्वस्थ व्हायला झालं. असं काही ऐकलं की अस्वस्थ वाटतंच. मनाला कुठेतरी लागतंच. त्या अपघातात २४२ जणांचा मृत्यू झाला. ऐकून खूप वाईट वाटलं. कोणाच्या ना कोणाच्या जवळचे, ओळखीचे त्यात होते. पण नशिबात लिहिलेलं असतं ते कुठेही चुकत नाही."
Alka Kubal: दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या दोन्ही लेकी प्रसिद्धीझोतापासून दूर, एक पायलट तर दुसरी...
त्या पुढे म्हणाल्या, "माझी मुलगी पायलट आहे. तिची जबाबदारीची ड्युटी आहे. म्हणून तर त्यांची परीक्षा, तयारी हे सगळंच किती कठीण असतं. अपडेट होणं गरजेचं असतं. मध्ये मध्ये त्यांचे क्लासेस असतात. आता ती इंडिगोत आहे. आधी गो एअरला होती. त्याआधी एक वर्ष एअर इंडियालाही होती. माझा जावईही इंडिगोला आहे. अहमदाबाद विमान अपघातात ज्या पायलटचं निधन झालं तो माझ्या जावईच्या मित्राचा मित्र होता. माझा जावई फारच अस्वस्थ झाला होता. तेव्हा माझी मुलगी दिल्लीत सीन चेक आणि फ्लाईंगसाठी गेली होती. ते सगळेच एकमेकांच्या तसे ओळखीचेच असतात . मला वाटतं हे कोणासोबतही होऊ शकतं. आमच्या क्षेत्रातही नाटकाच्या बसचे अपघात होऊन कलाकारांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे मला म्हणायचंय की जे व्हायचं असेल ते चुकत नाही. जोवर आपण आहे तोवर जबाबदारीने आपली कर्तव्य पार पाडावी. माणसं जोडावी, कोणाला दुखवू नये. जे आहे ते आयुष्य आनंदात जगावं."