'दशावतार' सिनेमा १२ सप्टेंबरला रिलीज झाला. हा सिनेमा रिलीज होऊन ४ आठवडे झाले आहेत, तरीही 'दशावतार' सिनेमा अजूनही लोकांच्या पसंतीस उतरत आहे. 'दशावतार'चा दिग्दर्शक सुबोध खानोलकरने मोठं विधान केलं आहे. 'दशावतार' सिनेमा कधीच बनला नसता, असं त्यांनी सांगितलं आहे. काय होतं यामागचं कारण? स्वतः दिग्दर्शक सुबोध खानोलकरने खास किस्सा सांगितला आहे.रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत सुबोध खानोलकरने सांगितलं की, ''मी जेव्हा गोष्ट लिहिली ना, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एकच नाव होतं ते म्हणजे दिलीप प्रभावळकर. कारण या भूमिकेची जी मागणी आहे, त्याच्यातली जी विविध रुपं आहेत, अभिनयासाठी विविध स्तरावर भावनिक बाजू आहेत, या सर्व गोष्टींसाठी एक कन्विक्शन लागतं. त्यामुळे हे सगळं करु शकणारा आणि तरीही त्या पात्रासारखा होऊन जाणारा कलाकार मिळणं खूप कठीण असतं. त्यामुळे दिलीप प्रभावळकर नसतील तर हा सिनेमा करणार नाही, असं आमचं ठरलं होतं.''
''दिलीप प्रभावळकरांना गोष्ट ऐकवली तेव्हा जनरली संवाद, हार्ड स्क्रीप्ट हातात असल्याशिवाय आणि खूप वाचन केल्याशिवाय ते होकार देत नाहीत. मी गोष्ट ऐकवली. त्यांनी अर्धा तास दिला. त्यानंतर आमची चर्चा होत अर्ध्याचे एक, एकाचे दोन आणि दोनाचे चार तास झाले. तेव्हा मला काहीतरी होऊ शकतं, अशी आशा निर्माण झाली. ते मला म्हणाले, मी इंटरेस्ट आहे पण आपण प्रोसेसमध्ये राहूया मग निर्णय घेऊ. मग मी माझा हुकुमाचा एक्का काढला. मी गुरु दादाला अप्रोच केलं.'' अशाप्रकारे सुबोधने हा खास किस्सा शेअर केला.
Web Summary : Director Subodh Khanolkar revealed that 'Dashavatar' might not have been made without Dilip Prabhavalkar. Khanolkar wanted Prabhavalkar for the role, believing only he could portray the character's emotional depth. Prabhavalkar initially hesitated but later agreed after discussions and approaching Guru Dada.
Web Summary : निर्देशक सुबोध खानोलकर ने खुलासा किया कि दिलीप प्रभावळकर के बिना 'दशावतार' शायद नहीं बनती। खानोलकर इस भूमिका के लिए प्रभावळकर को चाहते थे, क्योंकि उनका मानना था कि केवल वही चरित्र की भावनात्मक गहराई को चित्रित कर सकते हैं। प्रभावळकर ने शुरू में हिचकिचाया लेकिन बाद में चर्चाओं और गुरु दादा से संपर्क करने के बाद सहमत हो गए।