भारत गणेशपुरे बनणार गायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 13:55 IST
आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्रला खळखळून हसविणारा भारत गणेशपुरे आता, गायक बनणार आहे. भारत याने अनेक मराठी चित्रपटात देखील आपल्या ...
भारत गणेशपुरे बनणार गायक
आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्रला खळखळून हसविणारा भारत गणेशपुरे आता, गायक बनणार आहे. भारत याने अनेक मराठी चित्रपटात देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता, हाच अभिनेता आता, गायकाच्या रूपात प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाला आहे. भारत हा बरड या चित्रपटात गाणे गाणार आहे. प्रमोद गोरे यांची निर्मिती असलेल्या तानाजी घाडगे दिग्दर्शित बरड या चित्रपटासाठी त्यांनी गाणे गायले आहे. कोणी माती खाल्ली रे असे या गाण्याचे बोल असून संगीतकार रोहन रोहन यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. मिथिला कापडणीस यांनी हे गाणे लिहिले आहे.