अशिषने आजमावले नशीब
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 08:07 IST
रिलायन्स इंटरटेन्मेंटच्या पश्चिम विभाग वितरणाचा प्रमुख म्हणून पाच वर्षे काम केल्यानंतर आशिष वाघने चित्रपटसृष्टीत नशीब आजमवायचे ठरवले आणि तो ...
अशिषने आजमावले नशीब
रिलायन्स इंटरटेन्मेंटच्या पश्चिम विभाग वितरणाचा प्रमुख म्हणून पाच वर्षे काम केल्यानंतर आशिष वाघने चित्रपटसृष्टीत नशीब आजमवायचे ठरवले आणि तो नोकरी सोडून निर्मिती व आता ‘मि. अँड मिसेस सदाचारी’द्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरला आहे.त्याच्या प्रोडक्शन कंपनीने ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ आणि ‘तु ही रे’ हे दोन चित्रपट निर्माण केले आहेत. केवळ निर्मितीच करायची नाही म्हणून ‘मि. अँड मिसेस सदाचारी’चे दिग्दर्शनही केले आहे.दिग्दर्शनाची प्रेरणा कशी आली हे सांगताना तो म्हणाला की, मुळ कन्नड चित्रपटाच्या कथेने मी फार प्रभावित झालो होतो. तेव्हाच निर्णय घेतला की आपण यावर मराठीत सिनेमा करावा. कथेचा गाभा तोच ठेवत मराठी प्रेक्षकांना रुचेल अशा तºहेने त्यामध्ये योग्य तो बदल केला. चित्रपटातील हीरो समाजातील अन्यायाशी लढण्याकरिता शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतो असे दाखविले. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल असा मला विश्वास आहे.