भारतामधील ऐतिहासिक इमारतींचे रचनाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 01:17 IST
गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासामुळे भारतात स्मारकांची कमतरता नाही. प्रत्येक स्मारक इतरांपेक्षा वेगळे आहे. आपण ही स्मारके बºयाचवेळा पाहिलीही ...
भारतामधील ऐतिहासिक इमारतींचे रचनाकार
गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासामुळे भारतात स्मारकांची कमतरता नाही. प्रत्येक स्मारक इतरांपेक्षा वेगळे आहे. आपण ही स्मारके बºयाचवेळा पाहिलीही असतील, पण त्याची रचना कोणी केली अथवा निर्मिती कोणी केली, हे आपल्याला माहिती नसेल. अशाच स्मारकांचा इतिहास या ठिकाणी मांडतो आहोत...उस्ताद अहमद लाहोरी-ताज महल (आगरा)साºया जगाला माहिती आहे, बादशहा शहाजहानने आपली प्रिय पत्नी मुमताजच्या स्मृतीप्रित्यर्थ ताजमहल बांधला. साहजिकच शहाजहानचे मुमताजविषयीचे प्रेम आणि या स्थळाविषयी चर्चा केली जाते. मात्र या अत्यंत लोकप्रिय स्मारकाची रचना उस्ताद अहमद लाहौरी यांनी केली आहे. मीर अब्दुल करीम यांच्यासोबत त्यांनी याची उभारणी केली.लालचंद उस्ताद-हवा महल, जयपूरगुलाबी आणि लाल रंगाच्या दगडातून अत्यंत आकर्षक अशा हवामहलची जयपूर येथे उभारणी करण्यात आली. १७९९ साली महाराजा सवाई प्रताप सिंग यांनी हवामहल बांधले. पाच मजली बांधकाम आणि ९५३ खिडक्यांच्या या इमारतीचा रचनाकार लालचंद उस्ताद हा होता.एडविन ल्यूटन्स-राष्टÑपती भवन, नवी दिल्लीमुघल गार्डनसह ३४० खोल्यांचे हे भवन भारताच्या राष्टÑपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. अत्यंत सुयोग्य रचना असलेली ही इमारत ब्रिटीशकाळात व्हॉईसरॉयचे घर होते. तुर्कीमध्ये राष्टÑाध्यक्षांसाठीची नवीन इमारत बांधण्यापूर्वी म्हणजे २०१४ पर्यंत राष्टÑपती भवन हे सर्वात मोठे निवासस्थान होते. या इमारतीची रचना आणि बांधकाम एडविन ल्यूटन्स यांच्या अधिपत्याखाली झाले.फरीबोर्झ साहबा-लोटस टेम्पल, नवी दिल्लीबहार्इंचे प्रार्थनास्थळ असणारे लोटस टेम्पल १९८६ साली बांधण्यात आले. संगमरवरामधील कमळाच्या आकारामुळे या इमारतीस अनेक पारितोषिके मिळाली. जगभरातील सर्व धर्म आणि लोक एकत्र यावेत या उद्देशाने याची निर्मिती झाली. आशियामधील सर्वोत्कृष्ट इमारतींपैकी एक आहे. फरीबोर्झ साहबा यांनी याची रचना केली.मिरक मिर्झा गियाथ-हुमायूँचा मकबरा, नवी दिल्लीहुमायूँचा मकबरा हा फारसा प्रसिद्ध नाही. लालरंगाची ही इमारत मोठमोठे बगीचे आणि आकर्षक खोदकामामुळे मुघलकाळात घेऊन जाते. याची संपूर्ण रचना मिरक मिर्झा गियाथ यांनी १५६५ साली केली.उस्ताद अहमद लाहौरी-लाल किल्ला, नवी दिल्ली१८५७ सालापर्यंत लाल किल्ला मुगल बादशहाचा राजवाडा होता. दिल्लीच्या मध्यभागी असणाºया या इमारतीमध्ये काही संग्रहालये आहेत. त्यांनी सारा इतिहास जपला आहे. ताज महलची निर्मिती करणाºया उस्ताद अहमद लाहौरी यांनी लाल किल्ल्याचे निर्माण केले.जॉर्ज विटेट-गेट वे आॅफ इंडिया, मुंबईराजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या मुंबईमधील आगमनाप्रित्यर्थ, अपोलो बंदर येथे १९१४ साली गेट वे आॅफ इंडियाची निर्मिती करण्यात आली. भारतीय-अरबी पद्धतीचे हे बांधकाम आहे. ३१ मार्च १९११ साली याची कोनशिला रचण्यात आली. याची रचना जॉर्ज विटेट यांनी केली. १९२४ साली ही इमारत पूर्ण झाली.