काल 'छावा' (chhaava movie) सिनेमातील 'आया रे तुफान' (aya re toofan) गाणं रिलीज झालं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला समर्पित हे गाणं आहे. हे गाणं ए. आर. रहमान यांच्या बुलंद आवाजात आपल्यासमोर आलं. या गाण्याची खासियत म्हणजे, 'आया रे तुफान' गाणं मराठमोळे लेखक आणि पटकथाकार क्षितीज पटवर्धन (kshitij patwardhan) यांनी लिहिलंय. क्षितीज यांनी सोशल मीडियावर हे गाणं लिहितानाचा अनुभव शेअर केलाय.
छावाचं गाणं लिहितानाचा मराठी लेखकाचा अनुभव
मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनने 'छावा' सिनेमातील 'आया रे तुफान' गाणं लिहिलंय. क्षितीजने त्याच्या भावना सोशल मीडियावर शेअर करुन सांगितलंय की, "'छावा' च्या 'आया रे तूफान'च्या निमित्ताने... आयुष्यात कृतकृत्य झाल्याचा अनुभव मला "माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं" गाण्याला मिळत असलेल्या प्रेमानं येत असतानाच, छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगणार गाणं लिहायची जबाबदारी आली आणि वाटलं आपण खरंच भाग्यवान आहोत की आपल्याला दोन्ही राजांची शब्दरूपी सेवा करता आली."