रोजच्या मालिका पाहणे ही प्रेक्षकवर्गाची आवड बनली आहे. त्यात मालिका हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, पण रोज त्याच ग्लॅमरस साड्या, त्या भावनिक कथा असणाऱ्या मालिकेपेक्षा वेगळी अशी ‘लेक माझी लाडकी’ ही मालिका लवकरच भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळेल. अशाच या सुंदर अभिनेत्रीशी ‘लोकमत सीएनएक्स’च्या एडिटर जान्हवी सामंत यांनी साधलेला संवाद.तुला फक्त आईच्या भूमिका मिळतात, याबद्दल काय वाटतं?९- आईच्या भूमिका करणं यात चुकीचं काही आहे, असं मला वाटत नाही. कारण वयाच्या तिसाव्या वर्षी मला ‘बेटिया’ या मालिकेतून पहिल्यांदा आईची भूमिका करायला मिळाली होती. यामध्ये मला ५ मुलेदेखील दाखविली होती. त्यामुळे अशा भूमिका माझ्यासाठी कोणत्याही मालिकेत महत्त्वाची व मध्याची भूमिका असते. तसेच, यासाठी मला चेहऱ्यावर सुरकुत्या व पांढरे केस, अशा प्रकारचा लुक चेंज करावा लागला नाही. पण, या भूमिका मी खूप एन्जॉए करते. आईची भूमिका ही तुम्ही कित्येक मालिकांतून पार पाडली आहे. पण, ही भूमिका तुमच्यासाठी कशी वेगळी आहे?- हो, मला मान्यय, की मी कित्येक मालिकांत आईची भूमिका केली आहे. पण, ‘लेक माझी लाडकी’ मालिकेतील आईची भूमिका थोडी वेगळी आहे. या मालिकेतील आई खूप सशक्त व बिनधास्त आहे. आज आपण २१व्या शतकात असतानादेखील स्वत:च्या मुलीबद्दलचे निर्णय घेण्यास डगमगतो, तसेच तिच्या सासरच्या व्यक्तींसमोर बोलण्यासदेखील घाबरतो. नेमकी याच भूमिकेच्या विरुद्ध माझी भूमिका आहे. या मालिकेतील मी पार पाडलेली आईची भूमिका एकदम बिनधास्त आहे. ती आपल्या मुलीच्या बाजूने नेहमी खंबीरपणे उभे राहत असते. ती आई कुणालाही न घाबरता मुलीच्या विरुद्ध लढणाऱ्या सगळ्या गोष्टींचा सामना करते. भले ते तिच्या सासरचे कुटुंब असो. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे. रिअल लाइफमध्ये तुम्हीदेखील एक आई आहात. जेणेकरून, आजच्या तरुणांबाबत फारसे योग्य मत मिळत नाही. म्हणून एक आई म्हणून आजच्या तरुणाईसाठी काय महत्त्वाचे आणि काय आत्मसात करणे आवश्यक आहे? - सध्याची तरुणाई पाहता, ही मुले पाश्चिमात्य संस्कृतीचा पाठलाग करताना दिसत आहेत. यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप, जलद घटस्फोट, डेटिंग करणे यासारख्या जीवनाच्या महत्त्वाच्या गोष्टींचा पटकन निर्णय घेताना दिसतात. तसेच, या पाश्चिमात्य संस्कृतीचा परिणामदेखील आपण पाहत आहोत. त्यामुळे एक आई म्हणून मी एवढंच सांगू इच्छिते, की आजच्या मुलांनी नात्यांची मूल्ये व महत्त्व जोपासले पाहिजे. कारण, कुटुंबप्रणाली हा आपल्या संस्कृतीचा एक मुख्य स्तंभ आहे. आपले विचार व संस्कृती जपणे, हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे पालकांनीदेखील मुलांना योग्य शिक्षण व संस्कृती शिकविणे आवश्यक आहे.या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करून फक्त दोन आठवडे झाले आहेत. याबाबतचा आपला अनुभव कसा होता?- ही सांगायची घाई होईल; पण या मालिकेत आम्ही सगळे एकमेकांना नवीन आहोत. कारण यापूर्वीदेखील मी माझे पती अविनाश यांच्याव्यतिरिक्त कोणासोबतदेखील काम केलेले नाही. तसेच ‘लेक माझी लाडकी’ ही खरंच खूप छान टीम आहे. सर्व एकमेकांना समजून घेतात. त्याचबरोबर ब्रेकमध्येदेखील एकमेकांशी ओळख करून घेण्यास प्रत्येक जण उत्सुक असतो. शक्यतो सर्व मालिकांचे कथानक सारखे असते, तरीही तू तुझी भूमिका कशी सांभाळली व कसं वेगळपण दाखवलं?- टेलिव्हिजन शोच का? आपलं जीवनदेखील असंच आहे. रोज जगण्यात तेच-तेच रुटीन आणि संघर्ष असतात. तरी, एक कलाकार म्हणून आपल्या भूमिकेतून नेहमीच काहीतरी प्रेक्षकांना वेगळेपणा देण्याचा प्रयत्न करीत असते. पण, प्रत्येक भूमिका ही त्या-त्या पात्रावर अवलंबून असते. तरी त्या परिस्थितीच्या त्या भूमिकेला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न असतो आणि या भूमिकेला यश मिळाले, तर त्या प्रयत्नांचे समाधान मिळते.
इंडियन मदर्सनी मुलांच्या बाजूने उभे राहावे
By admin | Updated: April 24, 2016 01:58 IST